शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रत्येक तालुक्यात शिवाजी महाराजांचे स्मारक; विखे पाटील यांची माहिती

By शिवाजी पवार | Updated: March 10, 2024 14:06 IST

श्रीरामपुरातून सुरवात, पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागला

शिवाजी पवार 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरात गेल्या ४० वर्षांपासून रखडलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय मार्गी लागला. भाजपचे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महाराजांचे स्मारक उभारणार आहे. त्याची सुरवात श्रीरामपुरातून झाली, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.   

येथील आझाद मैदानावर अतुल्य सेवा सन्मान पुरस्कारांचे वितरण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, समन्वयक नितीन दिनकर, शिवाजीराव कपाळे, अविनाश कुदळे, केतन खोरे, सुरज सूर्यवंशी, रामपाल पांडे, प्रसन्न धुमाळ, मारुती बिंगले यावेळी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी कौशल्य विकास संस्था उभारण्यात येणार आहे. नगर, राहाता व श्रीरामपूर येथे या संस्था सुरू करू. मागील आठवड्यात नगर दक्षिणमध्ये कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तेथे २५ हजार बेरोजगार तरुण आले होते. त्यातील ७ हजार तरुणांना तेथे रोजगार देता आला. कौशल्य विकासातून उद्याच्या पिढीला समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे. सबका साथ सबका विश्वास या भाजपच्या नार्यामुळे लोकांचा विश्वास वाढला आहे. तळागाळातील जनतेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य पोहोचविण्याचा आपला प्रयत्न आहे. देश पातळीवर गोसेवा आयोगाची स्थापना झाली. राज्यामध्ये आपण त्या खात्याचा मंत्री झाल्यानंतर राज्य गोसेवा आयोगाची स्थापना केली. त्या माध्यमातून गोशाळा निर्माण करण्याचा उद्देश आहे.

शहराची वाढती लोकसंख्या गृहित धरून पुढील २५ वर्षांचा विचार करून १७८ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर करून दिली. योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे, असे विखे पाटील म्हणाले.