शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

नगर मनपा निवडणूक : शहरासाठी दिलीप गांधीनी काय केले? : संग्राम जगताप यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 11:41 IST

देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. नगरचा खासदारही भाजपचा आहे. तरीही शहराच्या विकासासाठी तुम्ही काय केले? असा खडा सवाल आ. संग्राम जगताप यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून थेट खा. दिलीप गांधी यांना केला.

अहमदनगर : देशात, राज्यात भाजपची सत्ता आहे. नगरचा खासदारही भाजपचा आहे. तरीही शहराच्या विकासासाठी तुम्ही काय केले? असा खडा सवाल आ. संग्राम जगताप यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून थेट खा. दिलीप गांधी यांना केला. ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवर आ. जगताप यांची मंगळवारी लाईव्ह मुलाखत झाली. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांची भूमिका जाणून घेत आहे. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची भूमिका आ. जगताप यांनी ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवर थेटपणे मांडली.महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असूनही शहराचा विकास झाला नाही, असा आरोप राष्ट्रवादीवर होत आहे, याकडे लक्ष वेधले असता, आ. जगताप म्हणाले, निवडणूक म्हटले की आरोप होतात. मात्र ते काय करतात आणि आम्ही काय केले, याला जाहीर सभांमधून उत्तर देणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशात भाजपची सत्ता आहे. त्यांचाच शहरात खासदार आहे. शहराच्या विकासासाठी काय केले, हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे. त्यावर ते बोलत नाहीत. आम्ही मात्र आधी काय केले, ते सांगतो, नंतर दुसऱ्यांनी काय नाही केले, ते सांगतो. मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी आणला. मात्र त्यालाही स्थगिती मिळविण्यासाठी आटापिटा झाला. अन्यथा आजघडीला शहरात चांगले रस्ते दिसले असते.दानवे यांनी ३०० कोटी रुपये आणू, असे सांगितले, याबाबत आ. जगताप म्हणाले, निधी देण्यासाठी यांना यापूर्वी कोणी अडविले होते़ आताही महापौरपद आमच्याकडे द्या तरच निधी देऊ अशी भाषा हे करीत आहेत़ ही नगरकरांना सरळसरळ धमकी आहे, असे जगताप भाजपवर टीका करताना म्हणाले़केडगावचे भांडवल कुणी केले?

केडगाव प्रकरणाचे सेनेने भांडवल केले़ ते सर्वांना माहित आहे़ ते वेगळे सांगण्याची गरज नाही. घटना दुर्दैवी आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. परंतु, या घटनेत निष्पाप लोकांना अडकविण्यात आले. ते नगरकरांना माहिती आहे. ज्यावेळी नगरकरांना संधी मिळेल, त्या-त्यावेळी नगरकर त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. केडगावची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. शहरासह जिल्ह्यात जवखेडा, कोपर्डी या दुर्दैवी घटनांमुळे नगरची राज्यभर बदनामी झाली.  त्यामुळे नगरबाबत इतर ठिकाणच्या लोकांचा गैरसमज झाला. वास्तविक पाहता नगरला सुशिक्षित लोक राहातात. केडगाव घटनेतील दु:ख बाजूला ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. एका घरात दु:खाचा प्रसंग घडला. त्याचे दु:ख झाले नाही. त्याचे भांडवल केले गेले.मुलाखत फेसबुकवर हिटआमदार संग्राम जगताप यांची मुलाखत लोकमत अहमदनगरच्या फेसबुक पेजवर लाईव्ह करण्यात आली. ही मुलाखत तब्बल २० हजार जणांपर्यंत पोहोचली, तर ६ हजार नगरकरांसह जिल्ह्यातील व राज्यातील नागरिकांनी ही मुलाखत पाहिली.मुलाखत अहमदनगर लोकमत फेसबुक पेजवर लाईव्ह असताना शेकडो नगरकरांनी त्यांना नगरच्या विकासावर प्रश्न विचारले, तर आ. जगताप यांच्या समर्थकांनी सडेतोड मुलाखत दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रमुखांना ‘लोकमत’ भवनमध्ये निमंत्रित करून त्यांचीही मुलाखत फेसबुक पेजवरून लाईव्ह केली जाणार आहे. यानिमित्ताने शहराच्या प्रश्नांचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाSangram Jagtapआ. संग्राम जगतापDilip Gandhiखा. दिलीप गांधी