शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

राष्ट्रीय जंतनाशक दिन : एकाच दिवशी १२ लाख जणांना जंतनाशक गोळ्या वाटप

By चंद्रकांत शेळके | Updated: February 13, 2024 19:26 IST

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रामध्ये राबवण्यात आली.

अहमदनगर : लहान मुलांना जंतापासून आतड्याचे आजार होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष काळजी घेतली जाते. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. १३) एकाच दिवशी ० ते १९ वर्षांपर्यंतची बालके, शालेय मुले-मुली अशा सुमारे १२ लाख लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रामध्ये राबवण्यात आली. यात एकूण ५ हजार ८८१ अंगणवाडी केंद्रामधून ३ लाख ३२ हजार ६२८ लाभार्थ्यांना, तसेच ५ हजार ४३८ शासकीय, अनुदानित व खासगी शाळांमधून ९ लाख ६० हजार ५३४ शालेय विद्यार्थ्यांना असे एकूण १२ लाख ९३ हजार १६२ लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्याचे नियोजन होते. त्यातील १२ लाखापर्यंत म्हणजे ९० टक्केहून अधिक जणांना एकाच दिवशी या गोळ्यांचे वाटप करण्याची किमया आरोग्य विभागाने केली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील अंदाजे २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून धोका आहे. आतड्यांतील कृमी दोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणास मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यातील कामगिरीवर विपरीत परिणाम होतो. तीव्र प्रमाणात कृमी दोष असलेले विद्यार्थी बऱ्याचदा आजारी असतात. त्यांना लवकर थकवा येतो व अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करु शकत नाही. आतड्यांतील कृमी दोष हे वैयक्तीक व परिसर अस्वच्छतेमुळे होतात. बालकांमध्ये याचा प्रसार दूषित मातीद्वारे फार सहजतेने होतो. शाळा व अंगणवाडी पातळीवरुन देण्यात येणारी जंतनाशक गोळी ही फार परिणामकारक आहे.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा उद्देश १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना अंगणवाडी, शाळा या ठिकाणी जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, तसेच पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे, हा आहे. मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखाने व महानगरपालिका येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.मंगळवारी शाळेमधील ६ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये १ ते ६ वर्षे वयोगटातील सर्व मुलां-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीने गोळ्या वाटपाचे नियोजन केले. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ही मोहीम यशस्वी केली.

त्या मुलांना २० फेब्रुवारीला मिळेल गोळीजे लाभार्थी मंगळवारी आजारी होते किंवा इतर कारणामुळे त्यांना गोळी घेणे शक्य झाले नाही, त्यांना २० फेब्रुवारी रोजी शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये गोळी देण्यात येणार आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर