शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
2
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
3
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
4
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
5
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
7
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
8
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
9
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
10
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
11
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
13
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
14
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
15
Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
16
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
17
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
18
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
19
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
20
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

कालव्यांना नाही, गोदावरीत पाणी सोडल्याने नागरिक संतप्त

By सचिन धर्मापुरीकर | Published: July 13, 2024 2:20 PM

पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला असताना पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी हजारो रुपये घालत पेरणी केली आहे. परंतु अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. अ

कोपरगाव (जि. अहमदनगर) : नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून कालव्यांऐवजी गोदावरी नदीत पाणी सोडल्याने शेतकऱ्यांसह कोपरगाव शहरवासीय संतप्त झाले आहेत. शहराला बारा दिवसांआड पाणी मिळते आहे, तर पावसाअभावी शेतकरी चिंतेत असताना, गोदावरीत पाणी सोडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्येही अद्याप अपेक्षीत पाण्याची आवक झालेली नाही. परंतू नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्याचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नाशिक शहर व निफाड तालुक्यात झालेल्या पावसामुळे बंधारा भरला आहे. त्यामुळे २०० क्युसेकने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले आहे. गोदावरी नदीत सोडलेले पाणी उजव्या व डाव्या कालव्यांना सोडले असते, तर शेतीसह शहराचा पाणी प्रश्न काही अंश सुटला असता. गोदावरीत पाणी सोडल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला असताना पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी हजारो रुपये घालत पेरणी केली आहे. परंतु अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. अनेकांच्या बोअरवेल व वहिरींनी तळ गाठलेला आहे. विशेष म्हणजे कोपरगाव शहरासह गाव खेड्यांना पिणी पुरवठा करणारे पाणी साठवण तलाव देखील कोरडे आहेत. कोपरगाव शहरातील नागरिकांना १२ दिवसाआड पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असताना, डोळ्यादेखत गोदावरीतून पाणी वाहून जात आहे.

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची परिस्थिती वाईट आहे. अशा परिस्थितीत पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीपात्रात सोडलेले पाणी जर गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यात सोडले असते तर परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी देता आले असते. पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारे तलाव भरले असते. नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असता. परंतु पाटबंधारे खात्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने नियोजन करत ऐन दुष्काळात गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून उजव्या व डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर व नागरिकांवर जणू केल्याची भावना निर्माण झाली आहे.

नांदूर मधमेश्वर धरणांतून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून कोपरगाव शहरवासीयांसह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पाटबंधारे विभागाच्या या कृतीचा जाहिर निषेध व्यक्त करतो.

-सुनिल अंबादास देवकर, माजी सभापती, कोपरगाव

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर