दरवर्षी भारतामध्ये २१ मे हा दिवस आतंकवाद विरोधी दिवस पाळला जातो. या दिवशी १९९१ साली भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली होती. आतंकवादसारख्या अमानवी गोष्टींमुळे अनेक निष्पाप बळी जातात. लोकांच्या मनात मरणाची भीती निर्माण होते. मानवी अधिकाराच्या विरुद्ध असणाऱ्या या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि परस्परांप्रती सद्भावना निर्माण व्हाव्यात याकरिता आतंकवाद, आतंकवादी लोकांच्या अमानवीय गोष्टी यामुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव जातो. त्यांच्यामध्ये मरणाची भीती निर्माण केली जाते. त्यामुळे या मानवी अधिकारांच्याविरुद्ध असणाऱ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि पुन्हा प्रेम आणि सद्भावनेने लोकांना जिंकण्यासाठी आतंकवाद विरोधी दिन पाळला जातो.
या दिवसाचं औचित्य लक्षात घेऊन तरुणांसह समाजातील सामान्यांना आतंकवाद विरुद्ध राहण्यासाठी शपथ दिली जाते. ऑनलाईन पद्धतीने ‘आतंकवाद विरोधी शपथ’ या उपक्रमात ९ विद्यापीठांशी संलग्न ११५ महाविद्यालयांतील ९१५ व्यक्तींनी सहभाग घेतला घेतला. राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. सुनील कवडे आणि उन्नत भारत अभियानचे समन्वयक विलास नाबदे यांनी नियोजन केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गायकर, डॉ. अरविंद नागवडे, डॉ. सय्यद रझाक, रजिस्ट्रार दीपक अल्हाट, डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांनी परिश्रम घेतले.