शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
2
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
3
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
4
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
5
"उद्धव ठाकरेंना 'मविआ'समोर कटोरा घेऊन फिरावं लागतंय", चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
6
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
7
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?
8
९ वेळा MA, २ वेळा PhD... आता आठव्यांदा UGC NET; परीक्षा क्रॅक करण्याचा अनोखा रेकॉर्ड
9
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
10
रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
11
Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तूंची चुकूनही करू नका खरेदी; लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी येईल घरी!
12
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
13
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
14
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
15
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
16
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
17
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
18
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
19
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
20
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग

त्रुटींवर मात करीत वृद्धेश्वरचे गाळप यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 4:19 AM

तिसगाव : ऊसाची विपुल उपलब्धता, साखरेला मिळणारा कमी बाजारभाव व मागणीही अत्यल्प अशी या हंगामात स्थिती होती. याही स्थितीत ...

तिसगाव : ऊसाची विपुल उपलब्धता, साखरेला मिळणारा कमी बाजारभाव व मागणीही अत्यल्प अशी या हंगामात स्थिती होती. याही स्थितीत वृद्धेश्वर साखर कारखान्याने सर्व त्रुटींवर मात करीत गाळप हंगाम यशस्वी केला, असे प्रतिपादन अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी केले.

शनिवारी सकाळी कारखान्याच्या गळीताची सांगता संचालक मंडळाच्या हस्ते विधिवत गव्हाणपूजा व ऊसाची शेवटची मोळी टाकून करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष रामकिसन काकडे, शेती समितीचे अध्यक्ष उद्धवराव वाघ, ज्येष्ठ संचालक सुभाषराव ताठे, सुभाष बुधवंत, डॉ. यशवंत गवळी, विधिज्ञ अनिल फलके, बाबासाहेब किलबिले, शरद अकोलकर आदी उपस्थित होते.

राजळे म्हणाले, प्रतिकूलतेतच संधी शोधत कारखान्याची कायम वाटचाल राहिली आहे. या हंगामात इथेनॉल उपपदार्थ निर्मिती करावयाचीच आहे. त्या अनुषंगाने संचालक मंडळाने पावले उचलली आहेत. या हंगामात ५ लाख २१ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन ५ लाख ५१ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. हे कारखान्याचे सांघिक यश आहे.

सर्व कर्मचाऱ्यांना दहा दिवसांचे वेतन बक्षीस स्वरुपात देण्यात येईल, अशी घोषणा संचालक राहुल राजळे यांनी केली. कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या १९ कामगारांचा प्रसंगी सपत्नीक सन्मान करण्यात आला. सत्काराने कामगार भारावले. उद्धवराव वाघ यांचे भाषण झाले. कार्यकारी संचालक जालिंदर पवार यांनी प्रास्ताविक केले. श्रीकांत मिसाळ यांनी आभार मानले. सरव्यवस्थापक भास्करराव गोरे, प्रशासकीय अधिकारी विनायक म्हस्के, लेखापाल संभाजी राजळे, आदीनाथ राजळे, अंकुश राजळे, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार हजर होते.

---

२३ वृद्धेश्वर

ऊसाची मोळी टाकून वृद्धेश्वर कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता करण्यात आली.