शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

गद्दारांना गाडण्यासाठी जनता निवडणुकांची वाट पाहत आहे - सुभाष वानखेडे

By अरुण वाघमोडे | Published: February 28, 2023 4:27 PM

ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने मंगळवारी (28) नगर शहरात आयोजित शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.

अहमदनगर : भाजपाने शिवसेनेसोबत राहून गद्दारी केली. या गद्दारांना गाडण्यासाठी आता सर्वसामान्य जनताच निवडणुकांची वाट पाहत आहे. हे सरकार मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करत नाही. कारण त्यांना पराभवाची भीती आहे. अशी टीका शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी राज्य सरकारवर केली. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने मंगळवारी (28) नगर शहरात आयोजित शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते.

मेळाव्याला महापौर रोहिणी शेंडगे, माजी आमदार विजय औटी, शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर, विजय कदम, उल्हास पाटील, शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, सहसंपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. वानखेडे म्हणाले केंद्र सरकार देशातील कंपन्या विकत असून सध्या देशात अंदाधुंद कारभार सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीच देणेघेणे नाही. शेतीमालाला भाव नाही. म्हणून राज्यात घटनाबाह्यरित्या स्थापन झालेल्या सरकारला जनता वैतागली आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर  जनता यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. यावेळी उपनेते विजय कदम, विनोद घोसाळकर, उल्हास पाटील, साईनाथ दुर्गे यांनीही राज्य सरकारवर टीका केली.या मेळाव्याला नगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर व राहुरी तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान सभागृहात झालेल्या या मेळाव्याला अपेक्षित उपस्थिती नसल्याने उपनेते विजय कदम यांनी पदाधिकाऱ्यांवर चांगलेच नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना