शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केडगाव दुहेरी खून प्रकरणात पोलिसांवर शिवसेनेचे अनिल राठोड यांचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 18:47 IST

अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीदरम्यान संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड पोलिसांवर दबाव आणत आहेत.

ठळक मुद्देधनंजय मुंडे यांनी वाचून दाखविले पोलीस अधिक्षकांनी महासंचालकांना लिहिलेले पत्र

नागपूर : अहमदनगर महापालिकेच्या पोटनिवडणुकीदरम्यान संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड पोलिसांवर दबाव आणत आहेत. शहरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्यास कारणभूत असून ते टोकाची भूमिका घेण्याची शक्यता आहे. अशा आशयाचे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी पोलीस महासंचालकांना पाठविले होत, असा  गौप्यस्फोट करीत  पाठविलेल्या पत्राचे वाचन विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत  केले. यावर शिवसेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. यावरून शिवसेना-राष्ट्रवादीच्या सदस्यांत खडाजंगी उडाली.  कोतकर व ठुबे यांच्या खून प्रकरणातील आरोपी स्थानिक लोकप्रतिनिधी यांची जामीनावर मुक्तता झाल्याने सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याबाबत शिवसेनेच्या नीलम गोºहे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या प्रकरणात अतिरिक्त चार्ज सिट दाखल करण्यात यावी, तसेच सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे अनील परब यांनी केली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली. धनंजय मुुंडे म्हणाले, हा निदंनीय प्रकार आहे. पोलिसांवर शिवसेना नेत्यांचा कशाप्रकारे दबाव होता. या प्रकरणातील खरे आरोपी कोण आहेत. हे पोलीस अधिक्षकांनी पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या पत्रातून स्पष्ट होते. शिवसेनेच्या मंत्र्यांनी या प्रकरणात जावीपूर्वक खोटा गुन्हा दाखल करायला लावला. पोलीस अधिक्षकांनी महासंचालकांना पाठविलेल्या पत्रात अनिल राठोड यांनी यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा उल्लेख केला आहे.  आमदार संग्राम जगताप यांना हकनाक गोवण्यात आल्याचा आरोप करून या पत्राची चौकशी करून यातील दोषीवर कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी केली. यावरून शिवसेना-राष्ट्रवादीच्या सदस्यांत जोरदार खडाजंगी उडाली. आरोप-प्रत्यारोप झाले. अनिल परब यांनी पत्र वाचण्यावर आक्षेप घेतला.  गोंधळामुळे तालिका सभापती गिरीश व्यास यांनी कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब केले. कामाजाला सुरुवात झाल्यानंतर मुंडे यांनी पुन्हा पत्र वाचायला सुरुवात केली. यावर मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिक्षकांनी जो अहवाल पाठविला आहे. तो तपासून निश्चित कारवाई कण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड