शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
7
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
8
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
9
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
10
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
11
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
12
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
13
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
14
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
15
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
16
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
17
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
18
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
19
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली

कामगाराच्या मुलाचे पगारासाठी पंतप्रधानांना साकडे; तनपुरे साखर कारखान्याने थकविला ५० महिन्यांचा पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 3:03 PM

डॉक्टर बा.बा तनपुरे सहकारी साखर कारखान्याने कामगारांचे ५० महिन्यांचे पगार थकविले आहेत. उपासमार सहन करणा-या कामगारांना दिलासा मिळावा म्हणून कामगाराचा मुलगा निखील चंद्रकांत कराळे यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हस्तक्षेप करण्याची साकडे घातले आहे.

राहुरी : येथील डॉक्टर बा.बा तनपुरे सहकारी साखर कारखान्याने कामगारांचे ५० महिन्यांचे पगार थकविले आहेत. उपासमार सहन करणा-या कामगारांना दिलासा मिळावा म्हणून कामगाराचा मुलगा निखील चंद्रकांत कराळे यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हस्तक्षेप करण्याची साकडे घातले आहे. तनपुरे साखर कारखाना हा खासदार डॉ. सुजय विखे यांच्या ताब्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून कामगारांचे पगार देण्याचा आदेश देवा अशी विनंती कराळे यांनी पत्राद्वारे केली आहे. कारखान्याच्या पगार मिळावा म्हणून कामगारांनी अनेकदा आंदोलने केली. तरी देखील कारखान्याने पगार देण्यासाठी टाळाटाळ केली आहे. कामगारांचे पगार देण्याचे शासनाचे धोरण असतानाही कारखाना मात्र पगार देत  नाही. कामगारांकडे पैसा नसल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षणही धोक्यात आले आहे, असेही असे कराळे यांनी पत्रात म्हटले आहे.   पगारासाठी केवळ आश्वासनेचलॉकडाऊनच्या काळात कामगारांचे पगार थकित ठेवू नयेत, असा शासनाचा आदेश आहे. मात्र डॉ.बाबा तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचे ५० महिन्यांच्या पगाराचे १०० कोटी रुपये थकले आहेत. याबाबत कामगारांनी संचालक मंडळाकडे वारंवार पाठपुरावा केला. याशिवाय अनेक वेळा आंदोलनही छेडली. पगार देऊ एवढेच आश्वासन संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पगारासंदर्भात साकडे घालण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असली तरी अद्याप कामगारांना पगार मिळालेले नाही. पगार देता येत नसतील तर कामगारांना आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कारखान्याचे कामगार चंद्रकांत कराळे यांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीSugar factoryसाखर कारखानेLabourकामगार