शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
3
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
4
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
5
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
6
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
7
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
8
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
9
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
10
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
11
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
12
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
13
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
14
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
15
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
16
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
17
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
18
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
19
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
20
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

राधाकृष्ण विखे म्हणतात...राहुल गांधींचे विधान दुटप्पी; काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 3:45 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान दुटप्पी आहे. निर्णयाचे अधिकार नसतील तर सत्तेत राहाता कशाला? बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा. राज्यातील निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरच राज्यातील काँग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.

लोणी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान दुटप्पी आहे. निर्णयाचे अधिकार नसतील तर सत्तेत राहाता कशाला? बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा. राज्यातील निर्माण झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेसबरोबरच राज्यातील काँग्रेस नेतेही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.

 काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर बुधवारी राधाकृष्ण विखे यांनी माध्यमांना ही प्रतिक्रीया दिली. राहुल गांधी यांचे विधान हे दुटप्पी आहे. सरकारमध्ये रहायचे आणि आम्हाला निर्णयाचे अधिकार नाही असे जाहीरपणे सांगायचे? मग सरकारमध्ये तुम्ही थांबलातच कशाला? तत्काळ सरकारमधून बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा. एकीकडे सत्तेत राहायचे. सत्तेचा मलीदा चाखायचा आणि दुसरीकडे निर्णयाचे अधिकार नाहीत म्हणून जबाबदारी झटकायची. असे दोन्ही बाजूने बोलायचे असे कसे चालेल? असा सवालही विखे यांनी केला.

 राज्यात एवढे मोठे संकट उभे आहे, मुंबईची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या परिस्थितीला सत्तेत सहभागी झालेले तीनही पक्ष जबाबदार आहेत. राज्यातील प्रत्येक घटक या संकटामुळे अडचणीत आला आहे. असे असताना सुध्दा खासदार राहुल गांधी यावर कधी बोलले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या काही व्यक्तीगत अडचणी असतील. त्यामुळे ते मातोश्री बाहेर जावू शकत नाहीत. परंतू बाकीचे मंत्री मुंबईत का थांबले नाहीत? याचे कोडे राज्यातील जनतेला उलगडलेले नाही, असेही ते म्हणाले.

 केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध माध्यमांतून २८ हजार कोटी रुपयांची मदत देवू केली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या या मदतीवर टीका करण्यापेक्षा राज्यातील जनतेला तुम्ही काय दिले? याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणीही विखे यांनी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलrahaataराहाताPoliticsराजकारणBJPभाजपा