शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

पाऊस सुरूच, वारी येथील गोदावरीच्या पुलावर पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 16:12 IST

नाशिक धरणक्षेत्रात व गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रासह कोपरगाव तालुक्यात रविवारपासून दररोज मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.२३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली. त्यामुळे वारी येथील गोदावरी नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या गावातील संपर्क तुटला होता.

कोपरगाव : नाशिक धरणक्षेत्रात व गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रासह कोपरगाव तालुक्यात रविवारपासून दररोज मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.२३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली. त्यामुळे वारी येथील गोदावरी नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या गावातील संपर्क तुटला होता.

सध्या जोरदार पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी गोदावरीत ३ हजार ६०० क्युसेकने पाणी सुरु आहे. सर्वत्र मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पुढील गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रातील ओढे, नाले यांचे पाणी सरळ नदीत येत आहे. त्यातच नदीवरील सर्वच बंधाऱ्यावर पाणी अडविण्यासाठी प्लेटा टाकलेल्या असल्याने पाण्याचा फुगवटा तयार झाला आहे.

वारीच्या पुलाची उंची कमी असल्याने पूल पाण्याखाली जात आहे. पुलावर पाणी आल्याने नदीच्या पलीकडील सडे, शिंगवे यागावातील नागरिकांचा वारीशी संपर्क तुटला आहे. पुलावर पाणी असतानाही काही नागरीक आपला जीव धोक्यात घालून संरक्षक कठडे नसलेल्या या पुलावरून जीवघेणा प्रवास करण्याचे धाडस करीत होते. दरम्यान यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यात वारीचा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावRainपाऊसWaterपाणी