शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
2
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
3
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
4
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
5
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
6
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
7
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
8
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
9
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
10
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
11
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
12
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
13
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
14
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
15
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
16
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
17
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
18
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
19
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
20
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

सगुणा पध्दतीने भाताचे उत्पादन वाढणार तिपटीने; २०० शेतक-यांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 3:30 PM

भात लागवडीसाठी ‘सगुणा’ तंत्रज्ञान वापरल्यामुळे  उत्पादन तिपटीने वाढण्याचा विश्वास शेतक-यांना आहे. खिरविरे व मान्हेरे केंद्रात जवळपास २०० शेतक-यांनी सगुणाला पसंती दिली आहे. पावसामुळे शेतकºयांचा आत्मविश्वास दुणावला आहे. 

हेमंत आवारी। 

अकोले : भात लागवडीसाठी ‘सगुणा’ तंत्रज्ञान वापरल्यामुळे  उत्पादन तिपटीने वाढण्याचा विश्वास शेतक-यांना आहे. खिरविरे व मान्हेरे केंद्रात जवळपास २०० शेतक-यांनी सगुणाला पसंती दिली आहे. पावसामुळे शेतक-यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. 

बायफ संस्थेच्या पुढाकाराने तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील मान्हेरे, आंबेवंगण, टिटवी, कोदणी, खिरविरे, पेढेवाडी, तिरडे, पाचपट्टा या भागात सगुणा तंत्रज्ञानाने भाताची लागवड केली आहे. आदिवासी भागात भात हे मुख्य पीक असून यावरच अर्थकारण अवलंबून असते. पारंपरिक पध्दतीने भात लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी ‘राप’ पध्दत वापरली जाते. यामुळे पालापाचोळा व शेणखत बायोमास जाळला जातो. धुरामुळे प्रदूषण होते. अनेक जीवजंतू व उपयुक्त असे जीवाणू नष्ट होतात. रोपे तयार करून त्याची पुनर्लागवड म्हणजेच आवणी केली जाते. चिखलनी आवणी कामासाठी कष्ट जास्त पडतात.

सगुणा भात लागवड तंत्रज्ञान वापरून लागवड करताना १४० सेंटीमीटर रुंदीचे व २० सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून त्यावर बियाणे पेरतात. त्यामुळे लागवडीचा परत खर्च येत नाही.  बियानेही कमी लागते. लागवड करताना दोन बिया व दोन ओळीतील अंतर २५ बाय २५ सेंटीमीटर ठेवतात. रासायनिक खतांचे व्यवस्थापन तण नियंत्रण ही कामेही सोपी होतात. भात कापणीनंतर याच वाफ्यांवर हरभरा, कडूवाल यासारखी पिके घेता येतात.

 आदिवासी भागातील लोक आजही  इर्जुकीने भात आवणी करतात. आता नव्या तंत्रज्ञानाचे महत्व पटत चालले असून काही शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे.

गतवर्षी ९५ शेतक-यांचा होता सहभागगतवर्षी ९५ शेतकरी या सगुणा प्रयोगात सहभागी झाले होते. पीक उत्पादनात चांगला फरक जाणवल्याने यावर्षी काळू करवंदे, किसन बांबेरे (कोदणी), देवराम भांगरे (देवगाव), बाळू गोडे(शेणीत) अशा दोनशे पेक्षा अधिक शेतक-यांनी सगुण पध्दतीने भात लागवड केली आहे.  शेतक-यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रात्यक्षिक दाखवण्यात आले होते. बायफचे जतीन साठे, राम कोतवाल, लीला कुर्हे यांनी हे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी परिश्रम घेतले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेAgriculture Sectorशेती क्षेत्र