शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

मुळा धरणातून उद्यापासून पुन्हा दुसरे आवर्तन सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 3:30 PM

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय रविवारी (दि.१० मे) दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

 राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय रविवारी (दि.१० मे) दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सोमवारपासून पुन्हा दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. उजव्या कालव्याला असलेल्या लिकेजचा सर्व्हे करून अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली व मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम खाते अतिथीगृहात झालेल्या बैठकीत उन्हाळी आवर्तन पुन्हा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून रविवारपर्यंत ६ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी वापरण्यात आले आहे. आवर्तन ४७ दिवस सुरू असूनही पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील टेलच्या ५०० हेक्टर क्षेत्र अद्याप ओलिताखाली आणायचे आहे. आवर्तनाला गॅप न दिल्याने ६५० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार आहे. उजवा कालव्याचे आवर्तन २० मार्चला सुरू केले होते. दुसºया उन्हाळी आवर्तनासाठी चार हजार दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात येणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे. बैठकीला मंत्री शंकरराव गडाख, मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सूचना केल्या. बैठकीस खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार पांडुरंग अभंग, मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, महावितरणचे कार्य अधीक्षक अभियंता सांगळे, सायली पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीDamधरणWaterपाणी