शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

श्रीरामपूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा; गहू, कांद्याचे नुकसान, वीजपुरवठा पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 13:40 IST

श्रीरामपूर शहर व तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. काढणीला आलेला गहू व कांदा पिकांना पावसाचा फटका बसला. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला व फळ पिकांचे उत्पादन यापूर्वीच वाया गेले होते. रब्बीतील पिकेही अवकाळी पावसामुळे हातची जाण्याची शक्यता आहे.

श्रीरामपूर : शहर व तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. काढणीला आलेला गहू व कांदा पिकांना पावसाचा फटका बसला. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे भाजीपाला व फळ पिकांचे उत्पादन यापूर्वीच वाया गेले होते. रब्बीतील पिकेही अवकाळी पावसामुळे हातची जाण्याची शक्यता आहे.बुधवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला पाऊस रात्री आठ वाजेपर्यंत कोसळला. शहरासह तालुक्यातील बेलापूर, उक्कलगाव, कारेगाव, वडाळा महादेव, खैरी निमगाव, उंदिरगाव, टाकळीभान यासह विविध भागांत जोरदार पाऊस पडला. अनेक गावात एक ते दीड इंच पाऊस झाल्याची माहिती मिळाली. रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांदा ही पिके काढणीला आली आहेत. हार्वेस्टिंग मशीन व मजुरांच्या सहाय्याने गव्हाची काढणी सुरू आहे. मात्र काल झालेल्या या पावसामुळे गव्हाचे उत्पादन वाया गेले आहे. पावसाबरोबर झालेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी गहू जमीनदोस्त झाला. त्याची सोंगणी करणे कठीण झाले आहे. शेतात काढणी करून जमा केलेला कांदा पावसामुळे भिजला. हा कांदा आता लवकर खराब होणार आहे. मात्र बाजार समितीचे व्यवहार बंद असल्याने कांदा विक्री होऊ शकणार नाही. परिणामी उत्पन्न वाया जाण्याची भीती आहे. महसूल प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. मात्र संचारबंदीमुळे त्यास अडचणी येणार आहेत.दरम्यान, वादळामुळे वीज वाहक खांब अनेक ठिकाणी कोलमडून पडले. बाभळेश्वर येथील वीज उपकेंद्रातून येणाºया वाहिनीला झालेल्या नुकसानीमुळे श्रीरामपूर शहराचा वीज पुरवठा बुधवारी रात्रीपासून बंद झाला आहे. तालुक्यातील अनेक गावे अंधारात होती. महावितरण विभागाचे कर्मचारी दुरुस्तीच्या कामाला लागले असले तरी गुरुवारी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. पाणीपुरवठ्याला त्यामुळे अडचणी आल्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र