शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

आकारी पडीक जमिनींचा ताबा देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:21 IST

श्रीरामपूर : तालुक्यातील ९ गावांमधील आकारी पडीक जमिनी कोणत्याही व्यक्तींना कराराने देऊ नयेत, असा आदेश उच्च न्यायालयाने शेती ...

श्रीरामपूर : तालुक्यातील ९ गावांमधील आकारी पडीक जमिनी कोणत्याही व्यक्तींना कराराने देऊ नयेत, असा आदेश उच्च न्यायालयाने शेती महामंडळाला दिला असल्याची माहिती विधीतज्ज्ञ अजित काळे यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या वारसांतर्फे या जमिनी परत मिळाव्यात आणि तोपर्यंत जमिनी कोणालाही हस्तांतरित करू नये, अशा स्वरूपाची याचिका जयदीप गिरीधर आसने व इतर यांनी विधीतज्ज्ञ अजित काळे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.

इंग्रज सरकारने १९१८मध्ये तत्कालीन कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ७ हजार ३६७ एकर जमिनी ३० वर्षांच्या कराराने ताब्यात घेतल्या होत्या. येवला येथे हा करार झाला होता. त्या जमिनी २३ जुलै १९२० रोजी इंग्रज सरकारने बेलापूर कंपनी इंडस्ट्रीज लिमिटेड (हरेगाव, ता. श्रीरामपूर) या कंपनीकडे वर्ग केल्या. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९६५मध्ये कंपनीचे नाव कमी करून सरकारने जमीन ताब्यात घेतली. या जमिनी शेती महामंडळाकडे वर्ग करण्यात आल्या. त्या आजतागायत महामंडळाकडेच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे वारस त्यासाठी लढा देत आहेत.

न्यायालयात यापूर्वी दाखल एका याचिकेत २०१९मध्ये सुनावणी दरम्यान शेती महामंडळाच्यावतीने जमिनीचा ताबा इतर कोणालाही देण्यात येणार नाही, असे अभिवचन देण्यात आले होते. मात्र, तरीही २० ऑगस्ट २०२०मध्ये श्रीरामपूर येथील हरेगाव मळा व साखरवाडी (ता. फलटण, जि. सातारा) मळ्यामधील जमिनी १० वर्षांच्या कराराने देण्याचा घाट घातला गेला.

या जमिनी अशा पद्धतीने देण्यात येऊ नयेत व शेती महामंडळाने १५ एप्रिल २०२१मध्ये जमिनी कराराने देण्यासंदर्भात काढलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशा मागणीची याचिका शेतकऱ्यांना दाखल करावी लागली. न्यायालयाने या प्रकरणामध्ये तातडीने मंगळवारी सुनावणी घेतली. न्यायालयाने या जमिनीच्या निर्णयासंदर्भात सरकारला ६ जून २०२१ रोजी शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच करारधारकांना जमीन वापरण्यास परवानगी व प्रवेश देऊ नये, असा आदेश केला आहे.

यावेळी शेती महामंडळातर्फे ॲड. पराग बर्डे व शेतकऱ्यांतर्फे ॲड. अजित काळे यांनी काम पाहिले.

---