शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमधील वाद मिटला, कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली; फेसबुकवर केली भावनिक पोस्ट
2
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
3
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
4
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
5
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
6
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
7
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...
8
“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?
9
उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."
10
प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज
11
Jio Financial ची आणखी एक खेळी; 'या' कंपनीसोबत विकणार इन्शूरन्स पॉलिसी, चर्चा कुठवर?
12
बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलं हिजबुल्लाहचं ड्रोन, पण...! इस्रायलचं टेन्शन वाढलं
13
दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती
14
चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक
15
माहिममध्ये रंगणार तिरंगी लढत, ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर
16
प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
17
एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व?
18
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
19
'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के.पी. पाटलांनी ठाकरे गटात केला प्रवेश; शिंदे गटाच्या आबिटकरांविरोधात रिंगणात उतरणार

केंद्र सरकारविरोधात लाक्षणिक धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:23 AM

श्रीरामपूर : कोरोना महामारी हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचा आरोप करत लाल निशाण पक्षाच्या वतीने सोमवारी पक्ष कार्यालयात लाक्षणिक ...

श्रीरामपूर : कोरोना महामारी हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याचा आरोप करत लाल निशाण पक्षाच्या वतीने सोमवारी पक्ष कार्यालयात लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

कोरोनाबरोबरच कामगार, शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अपयश आल्याने मोदी सरकारने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी पक्षाने राज्यभर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व निदर्शने केली. सर्व कार्यकर्त्यांनी घरात, पक्ष कार्यालयात एकत्र येत मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो लोकांना या महामारीत आपला जीव गमवावा लागला. रुग्णालयात बेड, ऑक्सिजनसह मूलभूत औषधे याचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. लसीकरण करण्यातही मोठ्या प्रमाणात प्रचंड गोंधळ होऊन बहुसंख्य नागरिक आजही वंचित राहिले. भविष्यात लस कधी मिळेल याची कसलीही शाश्वती राहिलेली नाही. या महामारीबरोबरच देशातील कामगार-शेतकरी विरोधी कायदे आणून त्यांना गुलामीत लोटण्यात आले.

देशातील सरकारी मालकीचे उद्योग व बँका मूठभर मंडळींना कवडीमोल भावात विकण्याचा एक प्रकारे सपाटाच लावला आहे. त्यामुळे देशाची आर्थिक घडीही पूर्णपणे विस्कळीत झाली असून मोठ्या प्रमाणात देशात बेरोजगारी व महागाई वाढलेली आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.

या सर्व परिस्थितीला केवळ मोदी सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत असून सरकारने तातडीने राजीनामा देण्याची मागणी लाल निशाणचे नेते कॉ. बाळासाहेब सुरूडे यांनी केली आहे. आंदोलनात राजेंद्र बावके, श्रीकृष्ण बडाख, जीवन सुरूडे, शरद संसारे, मदिना शेख,, अमोल लबडे, एल. बी. डांगे, उत्तम माळी, अरुण बर्डे, रामा काकडे सहभागी झाले होते.