शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

...त्यांना फक्त सरकार पडण्याची स्वप्ने, धनंजय मुंडे यांचा भाजप नेत्यांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 11:27 AM

राज्यातील सरकार मजबूत आहे. सरकार फक्त टिकण्यासाठी चालतेय, असे केवळ टीकाकार म्हणतात. राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही, असे म्हणणाऱ्या विरोधकांना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ बघू द्या, असा टोला राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला आहे.

अहमदनगर : राज्यातील सरकार मजबूत आहे. सरकार फक्त टिकण्यासाठी चालतेय, असे केवळ टीकाकार म्हणतात. राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही, असे म्हणणाऱ्या विरोधकांना ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ बघू द्या, असा टोला राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला आहे.

औरंगाबाद येथून आष्टी (जि. बीड) येथे जात असताना मंत्री मुंडे हे नगरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. यावेळी त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यातील भाजप नेत्यांवर टीका करताना मुंडे म्हणाले, सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्ष असे आम्ही एकरूप असून महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करीत आहोत. महाराष्ट्रात जी विकासकामे दिसतात, त्या सर्व कामांचे श्रेय सरकारमधील तिन्ही पक्षांचे आहे. विरोधी पक्ष आम्ही केलेल्या चांगल्या कामाला चांगले कधी म्हणणार नाही. कारण, ते विरोधी पक्षाचे कामच आहे. विरोधी पक्ष हा आमच्यावर कायम टीका करणार आहे. ज्या दिवशी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्या दिवसापासून विरोधी पक्ष टीकाच करीत आहे.

पंकजा मुंडे यांनी राज्यातील सरकार ‘स्थगित सरकार’ असल्याची टीका केली होती. त्याबाबत विचारले असता, मुंडे म्हणाले, त्यांना स्थगितीचा अर्थ कळाला तर चांगले होईल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDhananjay Mundeधनंजय मुंडेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस