शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

तीन हजार शिक्षकांना मिळणार का बदलीची संधी?

By चंद्रकांत शेळके | Updated: June 13, 2024 16:37 IST

पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याआधी सध्या कार्यरत शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार बदलीची संधी द्यावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने ६ मार्च २०२४ रोजी काढले होते.

अहमदनगर : पवित्र पोर्टलवरून शिक्षकांना नियुक्त्या देताना बदलीपात्र शिक्षकांना बदलीची संधी द्यावी, असे आदेश ग्रामविकास विभागासह शिक्षण विभागानेही दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना विनंती बदलीची संधी देऊन बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जुलैमध्ये या बदल्या होणार का, सीईओ याबाबत निर्णय घेणार का? याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याआधी सध्या कार्यरत शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार बदलीची संधी द्यावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने ६ मार्च २०२४ रोजी काढले होते. शिक्षण विभागाच्या या आदेशाची अंमलबजावणी सर्व जिल्हा परिषदांनी करावी, असे आदेश त्यानंतर ग्रामविकास विभागाने ११ मार्च २०२४ रोजी काढले. त्यानुसार अनेक जिल्ह्यात पवित्र पोर्टलनुसार भरती करण्याअगोदर शिक्षकांना बदलीची संधी देण्यात आली. काही जिल्ह्यात तर झालेली भरती प्रक्रिया रद्द करून बदलीला प्राधान्य देण्यात आले.

दरम्यान, अहमदनगर जिल्हा परिषदेने ग्रामविकासचे आदेश आल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ मार्च रोजी १४१ शिक्षकांना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पदस्थापना दिली. त्यावेळी शिक्षक संघटनांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला. मात्र, ग्रामविकासचा आदेश आपणास उशिरा मिळाल्याचे जिल्हा परिषदेचे म्हणणे होते. दरम्यान, १६ मार्चला लोकसभेची आचारसंहिता लागली. त्यामुळे बदल्यांचा विषय आपोआप मागे पडला. नंतर ग्रामविकासच्या आदेशाने शिक्षण विभागाने बदल्यांच्या प्रक्रियेची तयारी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार तालुकास्तरावर बदलीपात्र शिक्षकांचे अर्ज जमा करून घेण्यात आले. यात ३ हजारांहून अधिक अर्ज बदलीसाठी आल्याची माहिती आहे.

आता लोकसभेची आचारसंहिता संपली आहे. मात्र, विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता सुरू झाली आहे. १ जुलैपर्यंत ही आचारसंहिता आहे. त्यामुळेच त्यानंतर का होईना जिल्हा परिषदेने बदल्यांची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

दरम्यान, ग्रामविकास विभागाने १७ मे २०२४ रोजी सर्व जिल्हा परिषदांना पुन्हा स्मरणपत्र देऊन ११ मार्चच्या पत्राची कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार राज्यातील अनेक जिल्हा परिषदांनी बदल्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यामुळे नगर जिल्हा परिषदेच्या बदल्यांसंदर्भात वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते रावसाहेब रोहोकले यांच्यासह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे केलेली आहे. मात्र, अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

...तर जुलैमध्येही होऊ शकतात बदल्याया बदली प्रक्रियेबाबत काय कार्यवाही करायची, याबाबत जिल्हा परिषदेने ग्रामविकास मंत्रालयाकडे मार्गदर्शन मागविले आहे. मात्र, अद्याप त्यावर मार्गदर्शन आलेले नाही. त्यामुळे बदलीचा पेच निर्माण झाला आहे. हे मार्गदर्शन आल्यास जुलैमध्येही बदल्यांची प्रक्रिया होऊ शकते.

टॅग्स :Teacherशिक्षकAhmednagarअहमदनगर