शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

दारु दुकाने उघडण्याच्या निर्णयावर टीकास्त्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 8:28 PM

अहमदनगर:  नागपूर आणि औरंगाबादमध्ये अधिकाºयांची स्वत:हून दारुची दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला. अशीच भूमिका अहमदनगरच्या जिल्हाधिकाºयांनी का घेतली नाही? दारु ही एवढी जीवनावश्यक बाब आहे का? अशी टीका नगर जिल्ह्यातून सुरु झाली आहे. 

अहमदनगर:  नागपूर आणि औरंगाबादमध्ये अधिकाºयांची स्वत:हून दारुची दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला. अशीच भूमिका अहमदनगरच्या जिल्हाधिकाºयांनी का घेतली नाही? दारु ही एवढी जीवनावश्यक बाब आहे का? अशी टीका नगर जिल्ह्यातून सुरु झाली आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकाºयांनी मंगळवारपासून दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्ह्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. दारुबंदी आंदोलनातील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी ‘लोकमत’शी बोलतना म्हणाले, ‘नगर जिल्हा आॅरेंजमधून रेडझोनमध्ये न्यायला दारु दुकानांतील गर्दी कारणीभूत ठरेल. प्रशासनाला हा निर्णय घेण्याची एवढी घाई का झाली आहे. नागपूरसारख्या ठिकाणी तेथील आयुक्तांनी दारुची दुकाने उघडू दिली नाहीत. नगरलाच अशी काय आणीबाणी आली होती? ’राष्टÑ सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांनीही या निर्णयाला विरोध व्यक्त केला आहे. ‘कोरोनाला अटकाव करण्यासाठी शाळा, प्रार्थनास्थळे, व्यापार बंद आहे. मात्र, केवळ महसूल मिळतो म्हणून दारु दुकाने सुरु करणे अयोग्य आहे’, असे ते म्हणाले. माहिती अधिकारी कार्यकर्ते शशिकांत चंगेडे यांनीही प्रशासनावर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारु विक्री सुरु आहे. तेथे प्रशासन कारवाई करत नाही. एक पूर्ण स्पिरीटच्या टँकर पकडला त्याचाही तपास उत्पादन शुल्क विभाग लावत नाही. उलट दारुची दुकाने सुरु करण्याची प्रचंड घाई केली गेली. हॉटस्पॉट जेथे आहे तेथे लोकांना औषधे देखील मिळत नव्हती. आता दारु मात्र मुबलक मिळणार. हा विरोधाभास आहे. प्रशासनाने चुकीचा निर्णय घेतला आहे.’ ------------परवानाधारक व्यक्तींनाच दारु उपलब्ध व्हावीकोपरगाव : सरकारने दारू दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी दारू पिण्याचा परवानाधारक व्यक्तींनाच दारू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. नितीन पोळ यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. दीड महिन्यापासून दारू दुकाने बंद असल्यामुळे बºयाच अनुचित प्रकारांना आळा बसला आहे. असे असताना दारूची दुकाने सुरू केल्याने अनुचित प्रकार वाढून पोलीस प्रशासनावर ताण पडणार आहे. ज्यांच्याकडे थोडेफार पैसे शिल्लक आहे, ते दारू विकत घेतील मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत, असे मद्यपी दारू खरेदी करण्याकरिता कोणतेही अनुचित प्रकार करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. एवढे करूनही सरकारला दारू दुकाने सुरू करावी असे वाटत असेल तर ज्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे. अशा व्यक्तींना आधार लिंक केल्या शिवाय दारू उपलब्ध करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.ं