शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

जिल्हा परिषद शोकसभेत अपघातातील मृतांना श्रद्धांजली

By चंद्रकांत शेळके | Updated: May 15, 2023 22:52 IST

कामाचा कितीही व्याप असला तरी कोणालाही रविवारी कार्यालयात बोलावले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर: नाशिक येथून प्रशासकीय काम करून परतत असताना जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांचा शनिवारी अपघाती मृत्यू झाला. ही न भरून येणारी हानी आहे. परंतु यातून इतर कर्मचाऱ्यांनी बोध घेऊन सक्तीने रात्रीचा प्रवास टाळावा. तसेच कामाचा कितीही व्याप असला तरी कोणालाही रविवारी कार्यालयात बोलावले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

शनिवारी नाशिकहून प्रशासकीय काम करून परतत असताना नगर जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे कक्ष अधिकारी अशोक व्यवहारे आणि महिला बालकल्याण विभागाचे लिपिक विनायक कातोरे यांचा नगर-मनमाड रोडवर वांबोरी फाट्यानजीक झालेल्या अपघातात मृत्यू झाला. सोमवारी दुपारी या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सभागृहात शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजय कुमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रभारी कॅफो राजू लाकडझोडे, शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे अध्यक्ष संजय कडूस, सुभाष कराळे, विकास साळुंके, शशिकांत रासकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.या दुर्दैवी घटनेमुळे सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण तसेच इतर गोष्टी समोर आल्या आहेत. सुरक्षितता म्हणून प्रत्येकाने रात्रीचा प्रवास टाळलाच पाहिजे. तसेच रविवारी कोणालाही कामावर बोलावण्यात येणार नाही. खूपच तातडीची गरज असेल तर शनिवारी कोणाला बोलावले तर संबंधित खातेप्रमुखानेही उपस्थित राहावे. कामाचे योग्य वाटप व नियोजन केल्यास कोणत्याही कर्मचाऱ्यावर अतिरिक्त ताण येणार नाही. त्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश येरेकर यांनी दिले.

संभाजी लांगोरे यांनी शासनाकडून किंवा जिल्हा परिषदेकडून आवश्यक ती मदत मृतांच्या कुटुंबीयांना देण्याची ग्वाही दिली. कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करताना अतिरिक्त कामाचा ताण कमी करावा, रिक्त पदे भरावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर