शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

नदीत पाय घसरून पडल्याने कोपरगाव तालुक्यातील दोघांचा बुडून मृत्यू

By सुदाम देशमुख | Updated: November 2, 2024 14:43 IST

नदीवर गाडी धुवत असताना पाय घसरुन नदीत पडल्याने दोन  शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू झाला.

चांदीकासारे (जिल्हा अहिल्यानगर):  एकीकडे सर्वजण दिवाळीचा आनंद साजरा करीत असताना कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक मध्ये  उम्रावती नदीवर गाडी धुवत असताना पाय घसरुन नदीत पडल्याने दोन  शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज, शनिवारी दुपारी घडली. उत्तम राहणे (वय ४२), व माधव गमे (वय ३२) असे मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असून सर्वच कुटुंबात आनंदाचा क्षण आहे. परंतु याच आनंदावर विर्जन पडल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील मढी येथे घडली आहे. मढी येथील उम्रावती नदीवर आपले चारचाकी वाहन धुण्यासाठी गेले असता उत्तम राहणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहणे हे आपले वाहन धुत असताना पाय सरकून नदीत पडले. त्याच वेळी माधव गमे हे देखील त्यांना वाचवण्यासाठी गेले. दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बेपत्ता झाले. ही माहिती पंचक्रोशीत पसरल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेच्या पथकाने शोध घेतला. त्यावेळी मृतदेह सापडण्यास यश आले आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी राहणे आणि गमे कुटुंबीयांवर दु: खाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगर