शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
2
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
3
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
4
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
5
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
6
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
7
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
8
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
9
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
10
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
11
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
12
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
13
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
14
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
15
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
16
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
17
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
18
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
19
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
20
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

निळवंडेची पाणीपातळी ६१० मीटरवर स्थिर ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:24 AM

निळवंडे धरणातील पाण्याची पातळी नेहमी किमान ६१० मीटर असणे आवश्यक आहे. मात्र यंदा अधिक प्रमाणात पाणी सोडल्यामुळे निळवंंडे ...

निळवंडे धरणातील पाण्याची पातळी नेहमी किमान ६१० मीटर असणे आवश्यक आहे. मात्र यंदा अधिक प्रमाणात पाणी सोडल्यामुळे निळवंंडे धरणाच्या पाण्याची पातळी ६१० मीटरपेक्षा कमी झाली. त्यामुळे आदिवासी भागातील अनेक गावांतील उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तयार झाला असल्याने निळवंडे धरणातील पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे आहे.

निळवंडे धरणाच्या पाण्याची पातळी कमी ठेवल्याने

राजूर-केळुंगण-कोहकडी, पिंपरकणे-शेलविहीरे व पिंपळगाव नाकविंदा या तीन उपसा जलसिंचन योजना बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे मोहोंडूळवाडी, माळेगाव, कातळापूर, कोदणी, रणद बु, लाडगाव, टिटवी, शेणित, मान्हेरे, अंबेवंगण या सर्व गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. राजूर हे गाव १५ हजारांपेक्षा जास्त लोकवस्तीचे आहे व इतर गावे हे ३ हजार पेक्षा जास्त लोकवस्तीचे आहेत. तरी शासनाने धरणाच्या पाण्याची ६१० मीटर करावी, अन्यथा येथील सर्व गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर जलसंपदा विभागाकडून उपलब्ध करून देणे संदर्भात कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे.

तसेच राजूर- केळुंगण-कोहंडी, पिंपरकणे-शेलविहीरे व पिंपळगाव नाकविंदा या तीनही उपसा जलसिंचन योजनेचे पाणीपट्टीचे बिल शेतकऱ्यांकडून वसूल केले जाते. मात्र पाण्याचे नियोजन न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येते. पाण्याअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना जलसंपदा विभागाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी व आदिवासी भागातील जनतेला पिण्याचे पाणी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी पिचड यांनी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.