शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धनगर समाजाचा सरकारला एवढा राग का? उपोषणकर्त्याचा महाजनांना सवाल; २ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन

By चंद्रकांत शेळके | Updated: September 16, 2023 20:38 IST

धनगरांविषयी या सरकारला एवढा राग कशामुळे आहे, असा थेट सवाल उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनर यांनी मंत्री गिरीश महाजन यांना विचारला.

अहमदनगर : गेल्या ११ दिवसांपासून चोंडीत आरक्षणासाठी धनगर समाजाचे उपोषण सुरू असताना या सरकारमधील एकाही मंत्र्याला उपोषणकर्त्यांची भेट घ्यावीशी वाटली नाही. धनगरांविषयी या सरकारला एवढा राग कशामुळे आहे, असा थेट सवाल उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनर यांनी मंत्री गिरीश महाजन यांना विचारला.

आरक्षणासाठी धनगर समाजाचे चोंडी (ता. जामखेड) येथे गेल्या ११ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. त्यातील अण्णासाहेब रूपनर (वय ५५) या उपोषणकर्त्याची तब्बेत खालावल्याने शुक्रवारी रात्री त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची भेट घेण्यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरला आले होते. उपोषणकर्ते रूपनर यांच्या तब्बेतीची विचारपूस करत असतानाच रूपनर यांनी संताप व्यक्त केला. घटनेत तरतूद असताना गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षण देण्यास चालढकल सुरू आहे. त्यामुळे समाजबांधवांनी चोंडीत उपोषण सुरू केले. मात्र या सरकारने आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष केले. पालकमंत्र्यांसह एकही मंत्री आंदोलनाकडे फिरकला नाही. धनगरांविषयी या सरकारला एवढा राग का आहे? आम्ही एवढ्या दिवस तुमच्या पाठिशी राहिलो, मग आम्हाला वाऱ्यावर का सोडता. दोन दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास आपण औषधोपचार व पाणीही सोडू, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. दोन दिवसांत मुंबईत याबाबत बैठक घेऊन नक्की तोडगा काढू, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले. यानंतर ते चोंडी येथे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत आमदार राम शिंदेही होते.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, उपोषणकर्ते रूपनर यांचे ९ किलो वजन कमी झाले आहे. मला माहिती मिळाल्यानंतर तातडीने दाखल झालो. त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह समाजातील लोकांची दोन दिवसांत मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.

पालकमंत्री उपोषणाकडे का गेले नाहीत?गेल्या ११ दिवसांपासून धनगर समाजाचे उपोषण सुरू असताना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही. ते मुद्दामहून गेले नाहीत, असा समाजाचा आरोप आहे, याबाबत पत्रकारांनी मंत्री महाजन यांना विचारले असता ते म्हणाले, विखे का गेले नाहीत, याची माहिती मला नाही. मात्र मला समजल्यानंतर मी तातडीने आलो आहे. 

टॅग्स :Dhangar Reservationधनगर आरक्षणreservationआरक्षणGirish Mahajanगिरीश महाजन