शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी कामगारांचा अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By साहेबराव नरसाळे | Published: March 03, 2023 5:44 PM

माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि या कायद्याची जाणीवपूर्वक केली जात असलेली बदनामी तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला.

अहमदनगर : माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि या कायद्याची जाणीवपूर्वक केली जात असलेली बदनामी तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी जिल्हा हमाल पंचायतच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. 

संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, माथाडी महामंडळाचे सहचिटणीस सुभाष लोमटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेख लाल, सचिव मधुकर केकाण, सहसचिव बाळासाहेब वडागळे, सल्लागार अशोक बाबर, नंदू डहाणे, आशाबाई रोकडे, भैरु कोतकर, नारायण गिते, रामा पानसंबळ, रविंद्र भोसले, सतीश शेळके, मच्छिंद्र दहिफळे, विष्णू ढाकणे, किसन सानप, बबन आजबे, रत्नाबाई आजबे, लता बरेलिया, संजय महापुरे, भिमाबाई गाडे, राहिबाई गायकवाड, मंदाबाई सुर्यवंशी, आशाबाई शिंदे आदी उपस्थित होते.

 लोमटे म्हणाले, हमाल-मापाडी, स्त्री हमाल कामगार या कष्टकरी घटकांचे अनेक प्रश्न व मागण्या राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडे प्रलंबित आहेत. माथाडी कायदा 1969 साली अस्तित्वात आलेला आहे. हमाल कष्टकर्यांनी लढून मिळविलेला हा कायदा असंघटित कष्टकर्‍याना सामाजिक सुरक्षा देणारा देशातील पहिला कायदा आहे. काळाच्या कसोटीवरही हा कायदा आदर्श ठरला आहे.या कायद्यामुळे हमाल व माथाडी कामगारांना कामाची हमी व नियमन, भविष्य निर्वाह निधी, उपदान, विमा, आरोग्य सुविधा, बोनस इ. सुविधा आणि तंटे निवारण्यासाठी त्रि-सदस्यीय (मालक,कामगार व सरकारी अधिकारी इ.चे) मंडळ अस्तित्वात आले.

या कायद्यामुळे हमाल कष्टकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल तर झालाच, पण त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन ही बदलला आहे.माथाडी कायद्यांमुळे हमालांचे जीवनात आलेल्या स्थैर्‍यामुळे, शिकलेले तरुण ही या हमालीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात येवू लागले आहेत. मात्र काही विघ्नसंतोषी मंडळी जाणिवपूर्वक माथाडी कायद्याची बदनामी करीत आहेत, हे चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.