शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

१३५ जण सुरक्षितस्थळी

By admin | Published: August 02, 2016 11:57 PM

अहमदनगर : नाशिक जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला. रात्री उशिराने नदी पात्रातील विसर्ग वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून

अहमदनगर : नाशिक जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला. रात्री उशिराने नदी पात्रातील विसर्ग वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील नदीकाठच्या चार गावातील १३५ जणांना सुरक्षीत स्थळी हलविले. तसेच कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आदी नेवासा तालुक्यातील नदी काठच्या गावांना भेटी देऊन नागरिकांना स्थलांतरीत होण्याच्या सूचना तलाठ्यांमार्फत देण्यात आल्या आहेत.नदीकाठाच्या गावांतील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्याची मोहीम रात्री उशिराने प्रशासनाने हाती घेतली़ कोपरगाव तालुक्यातील मायेगावदेवी- २८, नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम-४७ श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर- २५, नाऊर-३५ जणांना सुरक्षितस्थळी हालविण्यात आले आहे़ याशिवाय नेवासा तालुक्यातील ३५ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्याची मोहीम नेवासाचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती़ ४डाऊच बुद्रूक शिवारातील डाऊच व कुरण बेट परिसरात भिल्ल आदिवासी समाजातील कुटुंबाची वस्ती आहे. शेती करून या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सकाळपासून गोदावरीला पाणी वाढू लागताच तहसीलदार प्रशांत खेडेकर, निवासी नायब तहसीलदार शिवाजी सुसरे व तलाठ्यांच्या पथकाने या लोकांना बाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र कुणीही ऐकले नाही़ सायंकाळी डाऊच व कुरण बेटाला गोदावरीच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळे रामदास सावळेराम शाख, लहू सावळेराम शाख, अर्जुन रामदास शाख, अनिल भास्कर शाख, भास्कर रामदास शाख, विष्णू फकीरा मोरे आदींसह एकूण २२ जण या बेटावर अडकून पडले. त्यांना वाचविण्यासाठी खेडेकर यांनी होडी पाठवून मदतीचे प्रयत्न केले. मात्र अंधार पडल्यावर मदत कार्यात अडथळे येत असल्याने प्रशासन हतबल झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सायंकाळी सात वाजता प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सरपंच कांताबाई दहे आदी उपस्थित होते.