शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

३६४ नादुरूस्त बंधाऱ्यांना हवाय ३२ कोटींचा निधी

By admin | Published: April 23, 2016 11:34 PM

अहमदनगर : १९७२ पासून जिल्हा परिषदेने बांधलेल्या पाझर तलाव, गाव तलाव, साठवण बंधारे आणि कोल्हापूर बंधाऱ्यापैकी ३६४ बंधारे नादुरूस्त आहेत.

अहमदनगर : १९७२ पासून जिल्हा परिषदेने बांधलेल्या पाझर तलाव, गाव तलाव, साठवण बंधारे आणि कोल्हापूर बंधाऱ्यापैकी ३६४ बंधारे नादुरूस्त आहेत. या बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी जि.प.ला ३२ कोटी रुपयांची गरज आहे. राज्य सरकार जलयुक्त शिवार योजनेवर भर देत असल्याने जि.प.च्या बंधारे दुरूस्तीसाठी निधी कसा उपलब्ध करावा, असा प्रश्न जि.प. समोर आहे. यामुळे पावसाळ्यात या नादुरुस्त बंधाऱ्यात साठलेले पाणी वाया जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या लघु-पाटबंधारे विभागाच्यावतीने स्वतंत्रपणे शून्य ते शंभर हेक्टरच्या आत बंधारे बांधण्यात येतात. यासाठी जिल्हा परिषदेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहेत. मात्र, गेल्या आठ ते दहा वर्षात निधी अभावी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाची दुरवस्था झालेली आहे. अलीकडच्या काही वर्षात निधी उपलब्ध होत नसल्याने मोठ्या संख्येने बंधाऱ्यांची कामे हाती घेता आलेली नाही. दुसरीकडे वर्षानुवर्षे दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बंधाऱ्यांना निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेने मागणी करूनही सरकारकडून निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही. सरकारने गेल्या वर्षीपासून जलयुक्त शिवार योजना सुरू केलेली आहे. या योजनेत ते कृषी विभागा मार्फत नव्याने बंधारे बांधत आहेत. यंदा या अभियानासाठी जिल्हा परिषदेच्या ३२ कोटी रुपयांच्या निधीला कात्री लावण्यात आलेली आहे. यावरून महसूल विरोधात जिल्हा परिषद असा बराच वाद पेटला होता. अखेर त्यात जिल्हा परिषद सदस्यांनी नादुरुस्त बंधारे सुचवण्यास सांगण्यात आलेले आहे. मात्र, त्या बंधाऱ्यांची निवड जलयुक्तमध्ये होईल की नाही, याबाबत सदस्य आणि पदाधिकारी साशंक आहेत. जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजनकडे बंधारे दुरूस्तीसाठी निधीची मागणी केली होती. मात्र, नियोजन समितीत तरतूद नसल्याने बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध होवू शकलेला नाही.