शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
3
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
4
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
5
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
6
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
7
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
13
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
14
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

८८ लाखांचे नुकसान

By admin | Published: August 27, 2014 11:05 PM

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे़ संगमनेर शहराला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे़ या पावसात सुमारे ८८ लाख रुपयांचे नुकसान झाले

अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे़ संगमनेर शहराला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे़ या पावसात सुमारे ८८ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, मदतीसाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने बुधवारी विभागीय आयुक्तांना सादर केला आहे़ अडीच महिन्यांपासून पावसाने दडी मारली होती़ खरिपाची पिकेही वाया गेली़ जिल्ह्यात टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली़ सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता़ संगमनेर शहरात सर्वाधिक १४६ मि़मी़ पाऊस झाला़ त्यामुळे संगमनेर शहरातील नाटकी पुनर्वसन वसाहत, अलकानगर, रेहमतनगर,नवीननगर रोड आदी परिसरातील सखल भागात पाणी साचल्याने घरांमध्ये पाणी घुसले़ या परिसरातील सुमारे ४०५ कुटुंबीय बेघर झाले़ त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले़ नागरिकांच्या घरातील अन्न धान्याचे नुकसान झाले आहे़ घरातील कपडे,इतर संसार उपयोगी वस्तू, विद्युत उपकरणे, गॅस शेगडी आदी वस्तू पाण्यात वाहून गेल्या असून, जिल्हा प्रशासनाकडून याविषयीचा पंचनामा केला असून, त्यामध्ये अतिवृष्टीमुळे या परिसरातील नागरिकांचे ८७ लाख ९० हजार ९०० रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ सदर प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे़ अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या आपत्तीग्रस्तांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत दिली जाते़ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने नाशिक येथील विभागीय आयुक्तांना नुकसान भरपाईविषयीचा प्रस्ताव सादर केला असून, अतिवृष्टीतील मदतीबाबत मार्गदर्शन मागविले आहे़ विभागीय आयुक्तांकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर संगमनेर शहरातील आपत्तीग्रस्तांना मदत दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.काय आहे अतिवृष्टीअतिवृष्टीमुळे सलग आठ दिवस घरात पाणी राहिले असेल किंवा घराची पडझड झाली असेल तर ही मदत देण्यात येते़ परंतु संगमनेर शहरात तसे झाले नसून, दुसऱ्या दिवशी पाणी वाहून गेले आहे़ त्यामुळे संगमनेर शहरातील नागरिकांना मदत द्यायची किंवा नाही,याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे़