शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

कावळे रुसले...दशक्रिया विधी थांबले; श्रीगोंद्यात नेमकं काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 10:49 AM

श्रीगोंदा शहरातील मयतांचे दशक्रिया विधी हे आता सिद्धटेक व इतरत्र केले जात आहेत. त्यामुळे सकाळी लवकर उठणे, दशक्रिया विधीला जाणे हे परवडण्यासारखे नाही.

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्रीगोंदा येथील सरस्वती नदीवरील दशक्रिया विधी घाट श्रीगोंदा नगरपालिकेने सुमारे एक कोटी रुपये खर्च करून बांधला. मात्र दीड वर्षांपासून दशक्रिया विधीकडे कावळ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे दशक्रिया विधी घाट ओस पडला आहे.

श्रीगोंदा शहरातील मयतांचे दशक्रिया विधी हे आता सिद्धटेक व इतरत्र केले जात आहेत. त्यामुळे सकाळी लवकर उठणे, दशक्रिया विधीला जाणे हे परवडण्यासारखे नाही. त्यात गरीब कुटुंबांना बाहेरच्या ठिकाणी जाऊन असे विधी करणे आवाक्याबाहेर असते. यामुळेच संभाजी ब्रिगेड, अरविंद कापसे यांच्या संकल्पनेतून खंडोबा मंदिरासमोर सरस्वती नदीच्या तिरावर २५ फेब्रुवारी ते १ मार्च या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये सलग पाच दिवस दशक्रिया विधी पूजेचा प्रयोग करण्यात आला. तेथे पाच पैकी तीन वेळा काकस्पर्श झाला. त्यामुळे आता काय करायचे? असा प्रश्न नातेवाईकांसमोर आहे. कावळा शिवत नाही म्हणून आपण मृत्यू पावलेल्या माणसाला मोक्ष मिळाला नाही, असे समजले जाते. म्हणून काकस्पर्शासाठी आता श्रीगोंद्यातील घाटावर विधी नकोच, अशी मानसिकता झाली आहे.

पाच दशक्रिया करण्याच्या प्रयोगासाठी पुजारी मोहोळकर, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नाना शिंदे, दिलीप लबडे, अरविंद कापसे, राजेंद्र राऊत, सुनील ढवळे, ॲड. गोरख कडूस, दत्ताजी जगताप, सागर हिरडे, भाऊसाहेब खेतमाळीस, गणेश पारे, मयूर आढाव, प्रवीण धुमाळ, वैभव हिरडे, सूरज शिंदे, गणेश ससाणे यांनी या उपक्रमात भाग घेतला.

श्रीगोंदा शहरात हॉटेलची संख्या वाढली आहे. हॉटेलमधील शिल्लक अन्न उघड्यावर मोठ्या प्रमाणात टाकलेले असते. त्यामुळे पक्षांना सहज पद्धतीने आहार उपलब्ध होतो. तसेच दशक्रिया घाटावर झाडांची संख्या कमी आहे. या दोन कारणांमुळे दशक्रिया विधी घाटाकडे येणाऱ्या कावळ्यांची संख्या कमी झाली आहे. घाट परिसरात वृक्षारोपण होणेही गरजेचे आहे. -दत्ता जगताप, दक्ष फौंडेशन, श्रीगोंदा