शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

भाजपकडून दबावतंत्राचा वापर-बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:15 PM

भाजप सरकार राजकारण करताना सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) वापर करीत आहे. अनेकांना नोटीस पाठवून त्रास दिला जातो आहे. देशातील ज्येष्ठ नेते असलेले राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील नोटीस पाठविल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. राजकारणात या पाच वर्षात आलेली ही पध्दत चुकीची आहे. भाजप सरकारकडून दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे, असा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. 

संगमनेर : भाजप सरकार राजकारण करताना सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) वापर करीत आहे. अनेकांना नोटीस पाठवून त्रास दिला जातो आहे. देशातील ज्येष्ठ नेते असलेले राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील नोटीस पाठविल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. राजकारणात या पाच वर्षात आलेली ही पध्दत चुकीची आहे. भाजप सरकारकडून दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे, असा आरोप कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.  शुक्रवारी संगमनेरात आयोजित पत्रकार परिषदेत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात बोलत होते. ते म्हणाले, राजकारण करताना केंद्रीय पातळीवरील संस्थांचा उपयोग केला जातो आहे. भाजप सरकार हेच करते आहे. राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीची नोटीस पाठविण्यात आली. यातील राजकारण सर्वसामान्य जनतेला समजते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी त्यांचा काहीही संबंध नसून ते बॅँकेचे कधी सभासद अथवा पदावर देखील नव्हते. पवारांनी पन्नास वर्षे राज्याच्या, देशाच्या संसदीय कार्यात सहभाग घेतला. महत्वाची पदे त्यांनी सांभाळली. केंद्रात, राज्यात कृषी क्षेत्रात त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले असून प्रत्येक कुटुंबापर्यंत त्यांचे कार्य पोहोचले आहे. दौºयावर असताना त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच त्यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस पाठविण्यात आली. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सर्व सुरू आहे. भाजपात प्रवेश केलेल्या कुठल्याही लोकांना नोटीस पाठविली गेलेली नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. राजकारण करताना भाजपचे धोरण चुकीचे असून लोकशाही मानणाºया सर्व घटकांनी याचा निषेध केला पाहिजे, असेही कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर