शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

शहरातील जलतरण तलाव बंद करा

By admin | Published: March 19, 2016 12:03 AM

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील काही भागात नागरिकांना वणवण करावी लागते आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील काही भागात नागरिकांना वणवण करावी लागते आहे. अशा स्थितीत जलतरण तलाव सुरू करून महापालिका दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत जलतरण तलाव बंद ठेवावेत, अशी मागणी मनसेने महापालिका उपायुक्तांकडे केली आहे.मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांनी उपायुक्त भालचंद्र बेहरे यांना शुक्रवारी निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळाची झळ नगर शहराला बसत आहे. नागरिक पिण्याच्या पाण्यावाचून वंचित असताना शहरात मात्र जलतरण तलावातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होते आहे. नगर शहरातील सर्व जलतरण तलाव तातडीने बंद करावेत. एकीकडे नगर शहरात दिवसा आड पाणी येते. केडगाव, शिवाजीनगर या भागात आठ ते दहा दिवसांनी पाणी मिळते. शहरात पाण्याची स्थिती गंभीर असताना जलतरण तलावांना मोठ्या दाबाने पाणी पुरवठा केला जातो. महापालिकेने हे तलाव बंद केले नाहीत, तर मनसे आक्रमक पद्धतीने तलाव बंद करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा डफळ यांनी दिला. यावेळी शहराध्यक्ष गिरीश जाधव, नितीन भुतारे, सुरज वाणे, अभिषेक मोरे, परेश पुरोहित आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)