शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

नगरमध्ये दूषित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

By अरुण वाघमोडे | Published: July 14, 2023 3:48 PM

पाणी पुरवठा करणारी उंच पाण्याची टाकी व संपवेलमध्ये गाळ साचल्यामुळे या भागात दुषित पाणी येत आहे.

अहमदनगर: नगर शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील स्टेशन रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या नळावाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तातडीने पाण्याच्या टाक्या साफ करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी प्रभागातील नगरसेवक प्रशांत गायकवाड यांच्यासह सुवर्णा जाधव व विद्या खैरे यांच्यावतने आयुक्तांकडे करण्यात आली आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे स्टेशन परिसरातील आगरकर मळा, अर्बन बँक कॉलनी, गवळी वाडा, संभाजी कॉलनी, जयभिम हौसिंग सोसायटी, गजानन कॉलनी, आनंदनगर, संजीवनी कॉलनी, आदर्श गौतमनगर, स्वामी समर्थ मार्ग, सागर कॉम्प्लेक्स, विशाल कॉलनी, एकता कॉलनी, बोहरी चाळ, नवीन व जुना टिळक रोड, पटेलवाडी, संजयनगर, गाझीनगर, काटवन खंडोबा रोड, आगरकर मळा व स्टेशन रोड संपूर्ण परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दुषित पिण्याचे पाणी येत आहे. 

या परिसराला पाणी पुरवठा करणारी उंच पाण्याची टाकी व संपवेलमध्ये गाळ साचल्यामुळे या भागात दुषित पाणी येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक आजारी पडले आहे. याबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत, याकरिता आगरकर मळा येथील पिण्याच्या पाण्याची उंच टाकी व संपवेल या दोन्ही टाक्या स्वच्छ धुवून घेण्यात याव्यात व सदरील भागातील पिण्याचा पाणी पुरवठा स्वच्छ व पुरेशा दाबाने करण्यात यावा. अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणी