शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

टंचाईचे संकट : २० दिवसांचा साठा शिल्लक

By admin | Published: April 07, 2017 2:55 PM

शहरासाठी नगरपालिकेने उभारलेल्या ४ साठवण तलावांमध्ये सद्य:स्थितीत एकूण २३ कोटी २० लाख लिटर इतकाच साठा शिल्लक असल्याने ६ दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यातून शहराला केवळ २० दिवस पाणी पुरवठा होऊ शकतो.

कोपरगाव : कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन दरवर्षी कोलमडते. शहरासाठी नगरपालिकेने उभारलेल्या ४ साठवण तलावांमध्ये सद्य:स्थितीत एकूण २३ कोटी २० लाख लिटर इतकाच साठा शिल्लक असल्याने ६ दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यातून शहराला केवळ २० दिवस पाणी पुरवठा होऊ शकतो. त्यातच तब्बल ५१ टक्के पाण्याची तूट होत असल्याने यंदाच्या कडक उन्हाळ्यात कोपरगावकरांवर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. शहराची लोकसंख्या जवळपास ७० हजारावर आहे. शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी नगरपालिकेने एकूण ८.२० दलघफू क्षमतेचे ४ साठवण तलाव बांधले आहेत. मात्र त्यात सध्या २३ कोटी २० लाख लिटर इतके पाणी शिल्लक आहे. प्रती माणसी १०० लिटर पाणी देण्याचे पालिकेचे धोरण आहे. त्यानुसार शहराला दररोज ११ लाख २५ हजार लिटर पाणी लागते. परंतु बाष्पीभवन, वहनातील तूट, गाळाने तलावांची साठवण क्षमता कमी झाली आहे. तर तब्बल ५१ टक्के पाणी गळतीत वाया जाते. सध्या शहराला ६ दिवसाआड केवळ ४५ मिनिटे पाणी पुरवठा केला जात आहे. शिल्लक पाणी साठा किमान २० दिवस पुरेल इतका आहे. पाणी योजनांवरील २ जलशुध्दीकरण केंद्रे चालू असून नवीन ४२ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच तेही कार्यान्वित होईल. गोदावरी कालव्यांना पाणी आल्यास ४ दिवसाआड पाणी पुरवठा करता येतो. मागील वर्षी उन्हाळ्यात २१ दिवसाआड पाणी पुरवठा केला गेला. पालिकेवर तीच नामुष्की पुन्हा ओढावण्याची भीती आहे.शहर हद्दीबाहेर २५ लाख लिटर पाणी औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना ३ लाख लिटर पाणी दिले जाते. तर शहर हद्दीबाहेर शिवारातील ओम नगर, शंकर नगर, कर्मवीर नगर, द्वारका नगर व गवारे नगर तसेच जेऊर पाटोदा व कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत २५ लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. १५ मेपर्यंत शिल्लक पाणी साठा पुरणार नगरपालिकेने उपलब्ध पाणी साठ्यांचा विचार करता ४ दिवसाआड पाणी पुरवठा केल्यास २ मे, ५ दिवसाआड केल्यास ९ मे व ६ दिवसाआड केल्यास १५ मेपर्यंत शिल्लक साठा उपयोगात आणता येईल. पाटबंधारे खात्याने गोदावरी नदीला १९ मे रोजी आवर्तन सोडण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे १५ ते १९ मे दरम्यान ४ दिवस निर्जळी राहणार आहे.