शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब

By admin | Published: April 23, 2016 1:04 AM

अहमदनगर : सावेडीतील नामदेव चौकातून जाणारा मुख्य रस्ता वादामुळे अजूनही डांबरीकरण होण्यास तयार नाही. नित्यसेवा सोसायटीत जाण्यासाठी खडबडीत रस्त्यावरून जावे लागते.

अहमदनगर : सावेडीतील नामदेव चौकातून जाणारा मुख्य रस्ता वादामुळे अजूनही डांबरीकरण होण्यास तयार नाही. नित्यसेवा सोसायटीत जाण्यासाठी खडबडीत रस्त्यावरून जावे लागते. सोसायटीतील दीडशे घरांतील नागरिकांनी पाणी हीच आमची मुख्य समस्या असल्याचे सांगितले. उखडलेले रस्ते डांबरीकरण झाले पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी ‘लोकमत’ समोर मांडली. ‘टीम लोकमत’ने शुक्रवारी सावेडीतील नित्यसेवा सोसायटीला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. सोसायटीत येणारा एकही रस्ता डांबरीकरण नाही. वसंत टेकडीकडून येणारा रस्ता डांबरीकरण असला तरी ठिकठिकाणी तो उखडलेला आहे. अंतर्गत रस्ते कॉँक्रिटीकरण आहे, मात्र मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर हे रस्ते झाले होते. अंतर्गत कॉँक्रिटीकरण रस्त्याकडेला असलेल्या गटारीवरील झाकणे ठिकठिकाणी फुटलेली आहेत. पाण्याचा दाब कमी असल्याने बहुतांश घरांना पिण्याचे पाणी मिळत नाही. मिळाले तरी ते पाणी गढूळ असते. शेवटच्या घरांना पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. सोसायटीच्या खुल्या जागेत खेळण्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, या खेळण्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे मुलांना खेळण्याचा आनंद घेता येत नाही. तुटक्या खेळण्यांवर जीव मुठीत धरून मुले खेळत असतात. कचरा संकलन करणारी घंटागाडी आठवड्यातून एकदा येते. घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिक घरातील कचरा उघड्यावर फेकतात, त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटते. स्वच्छता करणारे महापालिकेचे कर्मचारी कधीतरी येतात. पथदिवे आहेत. सोसायटीतील नागरिक एकत्रितपणे सार्वजनिक सण-उत्सव साजरे करतात. एकोपा असला तरी महापालिकेच्या पायाभूत सुविधा मिळण्याकरीता थेट सार्वत्रिक निवडणुकीची वाट पहावी लागते. महापालिकेचा कर नियमितपणे भरतो, मात्र सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. (प्रतिनिधी)नागरिक म्हणतात.....कचरा संकलन करणारी महापालिकेची घंटागाडी नियमित येत नाही. घंटागाडी येण्याकरीता स्वच्छता निरीक्षकांना फोन करावा लागतो, त्यानंतर घंटागाडी येते. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सांगूनही रस्ते दुरूस्त होत नाहीत. कसेतरी दिवस काढतो आहे. - संजय चिप्पाकचरा संकलन करणारी घंटागाडी आठवठ्यातून एकदा येते. नियमित घंटागाडी येत नसल्याने कचरा खुल्या जागेवर टाकला जातो. पिण्याचे पाणी कमी दाबाने येते. पाणी पुरवठा स्वच्छ होत नाही. गत पंधरवाड्यात तर पिण्याच्या पाण्यातून घाण आली होती. - रेणुका अलचेट्टीपिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. कमी दाबाने पाणी येते. पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी नागरिक नळाला मोटारी जोडतात. त्यामुळे अनेक घरांना पाणी मिळत नाही. तीन वर्षापूर्वी झालेले रस्ते उखडले असून ते डांबरीकरण होणे गरजेचे आहे. - वंदना दडगे.अंतर्गत रस्ते कॉँक्रिटीकरण असले तरी सोसायटीतील मुख्य रस्ते मात्र खराब झाले आहेत. पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्याने पुरेसे मिळत नाही. गटारीची झाकणे फुटलेली आहेत. त्याची दुर्गंधी परिसरात पसरते. - संगीता आल्हाटपिण्याचे पाणी येत नाही. कमी दाब असल्याने पुरेसे मिळत नाही. धुण्या-भांड्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहिरीच्या पाण्याचा वापर करावा लागतो. कचरा संकलन करणारी घंटागाडी नियमित येत नाही. - मनिषा तडका.सोसायटीतील कोणाकडेच खासगी बोअर नाही. सोसायटी स्थापन करतेवेळी तेथे सार्वजनिक विहीर खोदण्यात आली होती. तिचा वापर आजही सुरू आहे. विहिरीशेजारीच पाणी साठवण टाकी आहे. त्या टाकीत विहिरीचे पाणी सोडले जाते. ते पाणी सोसायटीतील नागरिक धुण्या-भांड्यासाठी वापरतात. महापालिकेचे पाणी कमी दाबाने येत असल्याने बहुतांश घरांना पाणी मिळत नाही. ज्यांना पाणी मिळत नाही, ती घरे सार्वजनिक विहिरीचे पाणी वापरतात. मात्र ते पिण्यायोग्य नाही.