शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

शेतकऱ्यांचे उपोषण

By admin | Published: August 27, 2014 10:55 PM

मुळा नदीत मुळा धरणातून जोपर्यंत पाणी सोडले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.

नेवासा : मुळा नदीवरील मानोरी, पानेगाव-मांजरी, वांळुजपोई- अंमळनेर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात धरणाचे पाणी सोडावे, या प्रमुख मागणीसाठी मुळा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी पानेगाव-मांजरी येथील नदीपात्रात मंगळवारपासून सुरु केलेले उपोषण बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरु होते. मुळा नदीत मुळा धरणातून जोपर्यंत पाणी सोडले जाणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.मुळा नदीवरील मानोरी, पानेगाव-मांजरी, पांजुळपोई, अंमळनेर हे तीन बंधारे मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांची जीवनरेषा आहे. याच बंधाऱ्यावर या भागातील शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. मुळा धरणातून या तीनही बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली होती. याची दखल संबंधित खात्याने न घेतल्याने आज परिस्थिती भयानक व दुष्काळसदृश झाली आहे, असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. या भागातील विहिरी, कुपनलिका कोरड्या आहेत. तीन वर्षापासून बंधाऱ्यात पाणीसाठा झालेला नाही. सध्या मुळा धरणात २० टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याने मुळा नदीवरील तीनही बंधारे भरणे गरजेचे होते. येथील सिंचन प्रश्न या बंधाऱ्यावरच अवलंबून असल्याने जनावरांसह पिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी येईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असे या शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. मुळा धरणातून वर्षातून बंधाऱ्यांना पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.उपोषणाचे नेतृत्व नेवासा तालुक्यातील शिरेगावचे सरपंच किरण जाधव, पानेगावचे उपसरपंच डॉ.जयवंत गुडघे, मुळाथडी पाणी हक्क आरक्षण कृती समितीचे उपाध्यक्ष विलास सैंदोरे, नानासाहेब जुंधारे करीत आहेत. उपोषणकर्त्यांची माजी आ़ भानुदास मुरकुटे, नेवासा तालुक्याचे ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, बाळासाहेब मुरकुटे, साहेबराव घाडगे, उत्तमराव म्हसे, बाळासाहेब पवार यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला. (तालुका प्रतिनिधी)