शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

गोदावरी कालवा दुसऱ्यांदा फुटला

By admin | Published: July 14, 2016 1:23 AM

कोपरगाव: गोदावरी डावा तट कालवा बुधवारी पहाटे दुसऱ्यांदा फुटला़ त्यामुळे कोपरगावकरांच्या हक्काचे लाखो लीटर पाणी पुन्हा वाया गेले आहे.

कोपरगाव: गोदावरी डावा तट कालवा बुधवारी पहाटे दुसऱ्यांदा फुटला़ त्यामुळे कोपरगावकरांच्या हक्काचे लाखो लीटर पाणी पुन्हा वाया गेले आहे. या प्रकाराने जलसंपदा विभागाचे पितळ उघडे पडले आहे. दारणा धरण क्षेत्रात पावसाने थैमान घातल्याने गोदावरी नदीला प्रचंड पाणी आले आहे. त्यामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी डावा व उजवा कालव्यांना सोमवारी रात्री पाणी सोडण्यात आले. परंतु मंगळवारी सकाळी साडेसात वाजता ब्राम्हणगाव शिवारात आहेर वस्तीनजीक डावा कालवा मुंगेर लागून भगदाड पडल्याने फुटला तर उजवा कालवा विंगणवाडीनजीक फुटला. दोन्ही कालवे फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. उजव्या कालव्याचे पाणी तातडीने बंद करून त्याची दुरुस्ती करण्यात आली. तर डाव्या कालव्याचा विसर्ग कमी करून संजीवनी साखर कारखान्याच्या पोकलॅन व जेसीबीच्या सहाय्याने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मातीचा भराव टाकून तात्पुरती डागडुजी केली. मात्र, काही तासांचा अवधी उलटताच बुधवारी पहाटे मंडपी नाल्याजवळ डावा कालवा पुन्हा दुसऱ्यांदा फुटला. कालव्याचे पाणी माधव लक्ष्मण तडाखे यांच्या शेतात व मंडपी नाल्यात वाहून गेले. इतक्या प्रचंड प्रमाणावरील पाण्यात तडाखे यांच्या शेतातील मका व सोयाबीन पिके बुडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर दुसऱ्यांदा कालवा फुटल्याच्या घटनेने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र शिंदे यांनी दुपारी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी कालवा विभागाचे उपअभियंता भास्कर सुराळे, शाखा अभियंता आर. एस. काळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)