शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

अहमदनगर जिल्हा बँक भरतीची निपक्षपातीपणे चौकशी करा; राष्ट्रवादीसह, भाजप, सेनाही चौकशीवर नाराज, काँग्रेसकडून प्रतिक्रियाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 10:51 AM

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीप्रक्रियेबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे याबाबत निपक्षपातीपणे चौकशी होऊन सर्व शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया राजकीय पक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. 

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीप्रक्रियेबाबत जनतेच्या मनात शंका आहेत. त्यामुळे याबाबत निपक्षपातीपणे चौकशी होऊन सर्व शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया राजकीय पक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत. जिल्हा बँकेच्या भरतीतील अनियमिततेबाबत ‘लोकमत’ गत तीन वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. बँकेच्या संचालक मंडळाने याबाबत मौन धारण केले आहे. मात्र, जनतेतून याबाबत नाराजी वाढत असून अनेकांनी शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, माहिती अधिकार कार्यकर्ते शशिकांत चंगेडे, वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक अरुण जाधव यांनी सहकार सचिव व आयुक्तांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनीही ‘लोकमत’ला प्रतिक्रिया देताना भरतीच्या चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी मात्र वरिष्ठांशी बोलून प्रतिक्रिया देऊ, असे सांगितले.

जिल्हा बँंक भरतीची निपक्षपातीपणे व योग्य एजन्सीकडून चौकशी होणे आवश्यक आहे. ही शेतक-यांची व नावाजलेली बँक आहे. तेथे काहीही गालबोट लागता कामा नये. तत्कालीन सहकार आयुक्त व इतर अधिकाºयांनी भरतीबाबत योग्य निर्णय घेतले आहेत का? ‘नायबर’ या संस्थेने भरतीचे नियम पाळले आहेत का? न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी झाली आहे का? या सर्व बाबींची तपासणी व्हावी. भरतीत गैरव्यवहार झाला असेल तर तो समोर यायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस कधीही अशा गोष्टींचे समर्थन करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले. 

न्यायालयाच्या निर्णयानंतर भरतीतील संशयास्पद उत्तरपत्रिका खासगी एजन्सीकडून तपासून का घेतल्या ही बाब शंकास्पद आहे. फेरचौकशीत संशयित उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपींची तपासणी झाली नाही ही बाब ‘लोकमत’ने समोर आणली आहे. ही तपासणी का झाली नाही हेही आक्षेपार्ह आहे. त्यामुळे योग्य चौकशी होणे आवश्यक आहे. सहकार हा सामान्य जनतेच्या हितासाठी आहे. या संस्थांमध्ये गैरकारभार होत असेल तर ते चूक आहे. सहकारी संस्थांवर सामान्य कुटुंबातील लोक येत नाहीत, तोवर असे प्रकार थांबणार नाहीत, असे भाजपचे उतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले. 

जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीत गैरव्यवहार झाले असतील तर त्याची निश्चित चौकशी झाली पाहिजे़ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी़ वेळप्रसंगी सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल़, असे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्र