शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

बंधारे भरून न दिल्यास आंदोलन

By admin | Published: August 09, 2016 11:54 PM

शिर्डी : गोदावरी धरण समूहातून सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून लाभक्षेत्रातील बंधारे तातडीने भरुन न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिर्डी लोकसभा

शिर्डी : गोदावरी धरण समूहातून सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून लाभक्षेत्रातील बंधारे तातडीने भरुन न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिर्डी लोकसभा युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे.या संदर्भात डॉ. सुजय विखे म्हणाले, मागील दोन वर्षांपासून गोदावरी लाभक्षेत्रात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. याचा विपरीत परिणाम लाभक्षेत्रातील शेतीक्षेत्रावर झाला. पाण्याअभावी शेती पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना पाण्याच्या दुहेरी संकटाला सामोरे जावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याचाही फटका पाण्याच्या आवर्तनाला बसला. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना वेळापत्रकाप्रमाणे आवर्तन मिळाले नाहीच, हक्काच्या पाण्यापासूनही वंचित राहावे लागले. ही बाब राज्य सरकार आणि जलसंपदा मंत्र्यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिली. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांच्या भावना आता संतप्त झाल्या आहेत.जिल्ह्यासह राज्यात पावसाचे आगमन चांगल्या पद्धतीने झाले असले तरी, गोदावरी धरणाच्या लाभक्षेत्रात सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. सद्यपरिस्थितीत गोदावरी धरण समूहाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे धरणातूनही गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. नदीपात्रातून वाहून जाणारे पाणी जायकवाडीच्या दिशेने जात असले तरी, लाभक्षेत्रातील बंधारे मात्र अद्यापही कोरडे राहिले आहेत. खरीप हंगाम लक्षात घेवून शेतकऱ्यांनी पाणी मागणीचे अर्ज विभागाकडे दाखल केले आहेत, ही बाब महत्वपूर्ण असतानाही त्याचे गांभीर्य विभागाने घेतलेले नाही.पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडून मान्य होत नसल्याने आता रस्त्यावर येवून आंदोलन करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाही, अशा स्पष्ट शब्दात डॉ. विखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लाभक्षेत्रातील गावांमध्ये शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे संकटही अद्याप दूर झालेले नाही. त्यामुळे लाभक्षेत्रातील गावांची गरज लक्षात घेवून गोदावरी नदी पात्रातून वाहून जात असलेले ओव्हरफ्लोचे पाणी बंधारे आणि कालव्यांद्वारे उपलब्ध करुन न दिल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन गावोगावी सुरु करण्याचा इशारा डॉ. विखे यांनी दिला.(तालुका प्रतिनिधी)