शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

नगर-औरंगाबाद महामार्ग अडविला

By admin | Published: April 23, 2016 11:39 PM

नेवासाफाटा : दुष्काळीस्थितीत शेतकऱ्यांना किमान पाच तास पाणी देण्याच्या मागणीसाठी नगर-औरंगाबाद महामार्गावर शनिवारी दुपारी १२ वाजता अन्नदाता शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला़

नेवासाफाटा : दुष्काळीस्थितीत शेतकऱ्यांना किमान पाच तास पाणी देण्याच्या मागणीसाठी नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासाफाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी दुपारी १२ वाजता अन्नदाता शेतकरी संघटनेने रास्ता रोको केला़ आंदोलकांनी महामार्गावरच टायर जाळून सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली़ यामुळे वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता़अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जयाजीराव सुर्यवंशी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले़ विधानसभेने कायदा करुन पाण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. त्याप्रमाणे पहिले पिण्यासाठी नंतर शेतीसाठी व त्यानंतर उद्योगासाठी पाणी द्यावे, असा कायदा सरकारने केला आहे़ मात्र, सरकारच हा कायदा मोडून शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवित आहे. कारखान्याचे पाणी बंद केले तर कर्मचाऱ्यांची उपासमार होईल, असा डांगोरा पिटवून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप सुर्यवंशी यांनी आंदोलकांसमोर बोलताना केला़ यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अंबादास कोरडे, तालुकाध्यक्ष गफ्फुर बागवान, बद्रीबापू बोळवे, किशोर दसपुते, माउली मुळे, बद्री पाचोटे, शिवाजी रोडे, गणेश झगरे, रामदास विघ्ने, दत्तात्रय कुलट, विजय जगधने यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत महामार्गावरच टायर पेटविले़ त्यामुळे वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला होता़ त्याचवेळी नेवाशाचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी आंदोलकांशी चर्चा करुन आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़मुळा पाटबंधारे विभागाचे राजेंद्र कांबळे, कामगार तलाठी सोपान गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. बिट हवालदार शिंदे, पोलीस नाईक शिरसाठ, लबडे, ढाकणे, जोशी, वाहतूक शाखेचे गरड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.(वार्ताहर)