शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

कालव्यांना नाही, गोदावरीत पाणी सोडल्याने नागरिक संतप्त

By सचिन धर्मापुरीकर | Published: July 13, 2024 2:20 PM

पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला असताना पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी हजारो रुपये घालत पेरणी केली आहे. परंतु अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. अ

कोपरगाव (जि. अहमदनगर) : नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून कालव्यांऐवजी गोदावरी नदीत पाणी सोडल्याने शेतकऱ्यांसह कोपरगाव शहरवासीय संतप्त झाले आहेत. शहराला बारा दिवसांआड पाणी मिळते आहे, तर पावसाअभावी शेतकरी चिंतेत असताना, गोदावरीत पाणी सोडल्याने नाराजी व्यक्त होत आहे.नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्येही अद्याप अपेक्षीत पाण्याची आवक झालेली नाही. परंतू नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्याचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नाशिक शहर व निफाड तालुक्यात झालेल्या पावसामुळे बंधारा भरला आहे. त्यामुळे २०० क्युसेकने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले आहे. गोदावरी नदीत सोडलेले पाणी उजव्या व डाव्या कालव्यांना सोडले असते, तर शेतीसह शहराचा पाणी प्रश्न काही अंश सुटला असता. गोदावरीत पाणी सोडल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटला असताना पाऊस येईल या आशेने काही शेतकऱ्यांनी हजारो रुपये घालत पेरणी केली आहे. परंतु अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. अनेकांच्या बोअरवेल व वहिरींनी तळ गाठलेला आहे. विशेष म्हणजे कोपरगाव शहरासह गाव खेड्यांना पिणी पुरवठा करणारे पाणी साठवण तलाव देखील कोरडे आहेत. कोपरगाव शहरातील नागरिकांना १२ दिवसाआड पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असताना, डोळ्यादेखत गोदावरीतून पाणी वाहून जात आहे.

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची व नागरिकांची पिण्याच्या पाण्याची परिस्थिती वाईट आहे. अशा परिस्थितीत पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीपात्रात सोडलेले पाणी जर गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यात सोडले असते तर परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतीला पाणी देता आले असते. पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारे तलाव भरले असते. नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असता. परंतु पाटबंधारे खात्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने नियोजन करत ऐन दुष्काळात गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून उजव्या व डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर व नागरिकांवर जणू केल्याची भावना निर्माण झाली आहे.

नांदूर मधमेश्वर धरणांतून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून कोपरगाव शहरवासीयांसह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पाटबंधारे विभागाच्या या कृतीचा जाहिर निषेध व्यक्त करतो.

-सुनिल अंबादास देवकर, माजी सभापती, कोपरगाव

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर