शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

नगरमध्ये आदिवासी वसतिगृहातील मुलांचे ‘अन्यत्याग’ उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 3:47 PM

आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात कोणत्याही सुविधा मिळत नसून, वसतिगृहाचे गृहपाल विद्यार्त्यांवर दडपशाही करतात, त्यामुळे त्यांची बदली करावी आदी मागण्यांसाठी वसतिगृहातील ६५ विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘अन्नत्याग’ उपोषण केले.

अहमदनगर : येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात कोणत्याही सुविधा मिळत नसून, वसतिगृहाचे गृहपाल विद्यार्त्यांवर दडपशाही करतात, त्यामुळे त्यांची बदली करावी आदी मागण्यांसाठी वसतिगृहातील ६५ विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘अन्नत्याग’ उपोषण केले.सावेडीतील भिस्तबाग चौकात आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे. शिक्षणासाठी नगरमध्ये असलेले राज्यातील आदिवासी विद्यार्थी येथे राहतात. परंतु विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. जेवण निकृष्ट दिले जाते. वसतिगृहाचे गृहपाल धनंजय खेडकर हे विद्यार्थ्यांना दमदाटी करतात. त्यांच्याकडे समस्या मांडल्या तर दडपशाही करतात. त्यांच्या त्रासाला विद्यार्थी वैतागले आहेत. त्यामुळे गृहपालांची बदली करावी, विद्यार्थ्यांना मंजूर क्षमतेइतकी शासकीय इमारत उपलब्ध करून द्यावी, कॉट, कॉम्प्यूटर, लॅब, अभ्यासिका उपलब्ध करून द्यावी, शुद्ध पाणी, तसेच चांगल्या भोजनाची व्यवस्था करावी आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी २० सप्टेंबर २०१७ रोजी आदिवासी आयुक्त (नाशिक), राजूर प्रकल्प कार्यालय, तसेच जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. परंतु त्याची कोणतीही दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. २) वसतिगृहात ‘अन्न त्याग’ उपोषण सुरू केले. मागण्या मान्य होईपर्यंत भोजन न करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर