शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

मोठ्या पक्ष्यांच्या फक्त मोठ्या बाता, जनतेसाठी कुणी काही करत नाही, महादेव जानगरांची टीका 

By अरुण वाघमोडे | Published: July 22, 2023 9:05 PM

म्हणूनच जनतेत जनजागृती करण्यासाठी जनस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे रासपचे संस्थापक, अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले.

अहमदनगर: राष्ट्रीय समाज पक्षाची जनस्वराज्य यात्रा जनतेच्या हितासाठी असून, कुणाच्या विरोधात नाही. प्रादेशिक पक्ष शेतकरी, कामगार हितासाठी संघर्ष करत आहेत. मोठमोठे पक्ष फक्त मोठमोठ्या बाता करतात, छोट्या माणसांची कामे करत नाही. म्हणूनच जनतेत जनजागृती करण्यासाठी जनस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे रासपचे संस्थापक, अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने महादेव जानकर यांनी काढलेली जनस्वराज्य यात्रा शनिवारी (दि.२२) शहरात दाखल झाली. यावेळी महिला आघाडीच्या वतीने चांदणी चौकात या यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी जानकर बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे प्रदेश सचिव रविंद्र कोठारी, महिला आघाडीच्या दक्षिण जिल्हाध्यक्षा मंदाकिनी बडेकर-भगत, आशा वाकळे, निर्मला केदारी, वर्षा आढाव, वैशाली कांबळे, सारिका सिद्दम, रुबीना शेख, फिरोजा दीदी, जयश्री कांबळे, रूपाली पगारे, महादेव भगत, मेहर कांबळे, महेंद्र कांबळे, संजय भिंगारदिवे, मुन्ना शेख, विजय पठारे, अमोल कांबळे, सागर जाधव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जानकर म्हणाले पंढरपुरला विठ्ठलाला साकडे घालून गेल्या दहा दिवसांपासून ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. शेतकरी सुखी व्हावा, कामगारांना दिवस चांगले यावे व युवकांना रोजगार मिळावा, या उद्देशाने जनस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. महाराष्ट्रासह भारतभर विविध राज्यातून ही रथयात्रा मार्गक्रमण करणार आहे. ही यात्रा मार्गक्रमण करत असताना सर्व जनतेला जागृक करण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्षा मंदाकिनी बडेकर-भगत म्हणाल्या की, समाजाला दिशा देण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून होत आहे. महादेव जानकर यांच्या सक्षम नेतृत्वाने पक्षाची वाटचाल सुरु असून, जनस्वराज्य यात्रेने समाज जागृती होत असून, मोठा वर्ग पक्षाशी जोडला जात आहे. महिलांचे मोठे संघटन उभे करुन पक्षाला बळकट करण्याचे कार्य सुरु असून, जिल्ह्यात महिलांचे चांगले संघटन उभे राहिले असल्याचे, ते म्हणाल्या. 

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरPoliticsराजकारण