शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

मतदारनोंदणीकडे राजकीय पक्षांनी फिरवली पाठ

By admin | Published: May 30, 2014 11:09 PM

अहमदनगर : विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान सुरू आहे.

अहमदनगर : विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान सुरू आहे. राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे यासाठी प्रशासनाला मदत करावी, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीकडे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पाठ फिरवली. प्रशासनामुळे लोकसभा निवडणुकीत लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचा आरोप करीत राजकीय नेत्यांनी आगपाखड केली होती. जिल्हा प्रशासनाने २९ मे पासून नावनोंदणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे किसनराव लोटके वगळता कोणीच प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहिला नाही. भाजपचेही कोणी पदाधिकारी बैठकीकडे फिरकले नाही. खासदार दिलीप गांधी यांचे स्वीय सहायक मात्र हजर होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनील माळी, उपजिल्हाधिकारी कर्डक आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत दुबार तसेच पत्त्यावर न सापडलेल्या तब्बल १ लाख ४९ हजार मतदारांची नावे यादीतून वगळली होती. मात्र, या नावांपैकी कोणीही आक्षेप घेतला नाही. मतदार नोंदणी अभियान सुरू असताना लोकांचे तिकडे दुर्लक्ष होते. नंतर मात्र, प्रशासनावर खापर फोडले जाते. १ जानेवारी २०१४ रोजी ज्यांना १८ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांना तसेच ज्यांची नावे वगळली गेली त्यांना मतदानासाठी नावनोंदणी करता येईल. मतदान केंद्र बदलासाठीही फॉर्म भरता येईल. तहसील कार्यालयात नावनोंदणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ९ जूननंतर बीएलओ घरोघरी जाऊन नोंदणी करतील. जास्तीत जास्त मतदारांची नोंद व्हावी यासाठी राजकीय पक्षांनी बीएलओ नेमावेत अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. त्यांना जास्तीत जास्त १० फॉर्म देता येतील. (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत वापरलेली मतदान यंत्र (ईव्हीएम) जुनाट आहेत. त्यातच त्यातील डाटा सहा महिन्यांपर्यंत राखून ठेवावा लागतो. त्यामुळे ती गुंतून पडली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार १०० नवीन मतदान यंत्र लागतील. लोकसभेला ३ हजार ५६७ व सहायकारी १४ मतदान केंद्र होती. एका केंद्रावर शहरी भागात १ हजार ४०० व ग्रामीण भागात १ हजार २०० मतदार होते. विधानसभेला हे सूत्र बदलू शकते.