अहमदनगर : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची निवड करण्यात आली आहे़ या समितीत पवार यांच्यासह रवी साठे, विनय सहस्त्रबुद्धे, कमल किशोर, डॉ.हर्ष भनवाला, अंजली पारसनीस, अदिती फणसाळकर यांच्यासह अप्पर मुख्य सचिव, कृषिप्रधान सचिव, सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांचा समावेश आहे़समितीची पहिली बैठक २७ एप्रिल रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे़ या बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा व धोरणास मान्यता, आपत्ती धोके कार्यक्रमास मुदतवाढ व कायमस्वरुपी पद निर्मिती, आपदग्रस्तांना किमान सहाय्याबाबत निकष राज्यात लागू करणे, शालेय सुरक्षा कार्यक्रम राबविणेबाबत राज्य व जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राची उभारणी, शोध व बचाव साहित्य खरेदीस मान्यता आदींबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे पवार यांनी सांगितले़ पवार यांची आपत्ती व्यवस्थापन समितीवर निवड झाल्याने त्यांचे विविध क्षेत्रातून कौतूक होत आहे.(प्रतिनिधी)
आपत्ती व्यवस्थापन समितीवर पोपटराव पवार
By admin | Published: April 24, 2016 10:57 PM