शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

मुळा धरणावर पावसाची विश्रांती; नदीपात्रातून आवक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:51 AM

गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाकडे होणारी पाण्याची आवक १५०० क्युसेकवर खाली घसरली आहे़ धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे़

राहुरी : गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाकडे होणारी पाण्याची आवक १५०० क्युसेकवर खाली घसरली आहे़ धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे़२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा २५ हजार ७४० दशलक्ष घनफुटावर स्थिरावला आहे़  धरणात पाण्याची पातळी १ हजार ८११़५५ फुटावर आहे़ मुळा धरण ९८़९९ टक्के भरले आहे़ सध्याचा पाणीसाठा स्थिर ठेऊन दोन्ही कालवे व मुळा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ उपयुक्त पाणीसाठा २१२३८ दशलक्ष घनफूट इतका आहे़ गेल्या वर्षी मुळा धरणात २४ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा जमा झाला होता़  याशिवाय १९०० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सोडण्यात आले होते़गेल्या वर्षी मुळा धरणातून शेतीसाठी दोन आवर्तन मिळाले होते़ नदीपात्रातील बंधाºयामध्ये पाणी शिल्लक न राहिल्याने मुळा काठाला हादरा बसला होता़  यंदा दोन्ही कालव्यातून चार आवर्तन मिळणार आहेत़ नदीपात्रातून ३ हजार ७०० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले आहे़ डाव्या कालव्यातून ४० क्युसेकने शेतीसाठी आवर्तन सुरू आहे़ उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने पाण्याचे शेतीसाठी आवर्तन सुरू आहे.आतापर्यंत मुळानगर येथे ४३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ मुळानगर परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे़ कोतूळ येथे यंदाच्या पावसाळ्यात ८४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने सरासरी ओलांडली आहे़ गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रावर पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दोन्ही कालव्याव्दारे शेतीसाठी ऐन पावसाळ्यात आवर्तन सुरू आहे़ शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ पोळ्यानंतर रब्बीच्या पेरण्यांना वेग येतो़ मात्र सध्या रब्बीच्या पेरण्यांना वेग नाही.मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून ४० क्युसेकने शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शेतक-यांनी मागणी केलेली नाही़ त्यामुळे डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला नाही़ शेतकºयांनी मागणी केल्यास विसर्ग वाढविला जाईल़, असे मुळा धरण अभियंता रवींद्र आंधळे यांनी सांगितले.

टॅग्स :WaterपाणीDamधरण