शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

साई संस्थान पुन्हा ‘अ‍ॅक्टीव्ह’, आषाढी निमित्त अडीचशे क्विंटलची खिचडी

By admin | Published: July 15, 2016 5:30 PM

पाण्याची उपलब्धता झाल्याने साईसंस्थानच्या सर्व सेवा पुर्ण क्षमतेने पुन्हा कार्यरत झाल्या असुन भाविकांनी गुरूपौर्णिमा उत्सवात सहभागी होवुन आत्मिक आनंद मिळवावा

ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. १५ - पाण्याची उपलब्धता झाल्याने साईसंस्थानच्या सर्व सेवा पुर्ण क्षमतेने पुन्हा कार्यरत झाल्या असुन भाविकांनी गुरूपौर्णिमा उत्सवात सहभागी होवुन आत्मिक आनंद मिळवावा असे आवाहन संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी केले आहे़
 दरम्यान साईसंस्थान मध्ये आज आषाढी एकादशीच्या उपवासा निमीत्ताने अडीचशे क्विंटलची खिचडी बनवण्यात आली़ यात नास्ता व जेवणासह जवळपास ऐंशी हजार भाविकांनी फराळाचा लाभ घेतल्याचेही शिंदे यांनी सांगितले़
गेल्या तीन चार महिन्यांपासुन पाणी टंचाईने शिर्डीला घेरले होते़ महिनाभरापासुन तर संस्थान व नगरपंचायतचे साठवण तलाव पुर्ण कोरडे पडले होते़ यामुळे संस्थानवर भक्तनिवास,दोन्ही उप प्रसादालये बंद ठेवण्याची दुर्देवी वेळ आली होती़ मुख्य प्रसादालयातही पत्रावळीवर भोजन देण्यात येत होते़ धरण क्षेत्रावर पाऊस होवुन पाणी सुटले नाही तर गुरूपौर्णिमा उत्सवात काय करायचे असा यक्ष प्रश्न संस्थान पुढे निर्माण झाला होता़ दरम्यान कालव्यांना पाणी सुटून दोन दिवसांपुर्वी संस्थान तलावात पाण्याची आवक सुरू झाली़ यामुळे संस्थानने तत्काळ सर्व भक्तनिवास व प्रसादालये सुरू करण्याचा निर्णय घेतला़
आषाढी एकादशी निमीत्त परंपरे प्रमाणे संस्थान प्रसादालयात आज तब्बल अडीचशे क्विंटलची साबुदाणा खिचडी बनवण्यात आली़ यात ८० क्विंटल साबुदाणा, ४१ क्विंटल शेंगादाणा, १२़७५ क्विंटल तुप, २२़ ८० क्विंटल बटाटा, ६० किलो भगर आदीचा समावेश होता़ सकाळी ३१ हजार ३५१ नास्ता पाकीटांची विक्री झाली़ या प्रत्येक पाकीटाची किंमत पाच रूपये आहे़ यानंतर दुपार पर्यंत साडे सोळा हजार भाविकांनी फराळ प्रसादाचा लाभ घेतला़ रात्री उशीरापर्यंत हा आकडा पंचेचाळीस हजारा पर्यंत जाण्याची शक्यता प्रसादालय प्रमुख विष्णु थोरात यांनी व्यक्त केली़ आज एका भाविकाने एक लाख रूपये अन्नदानासाठी दिल्याने यातुन सकाळी प्रथम आलेल्या दहा हजार भाविकांना मोफत फराळ प्रसाद देण्यात आला़. (तालुका प्रतिनिधी)