शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

साईनगरीत साई स्तवनमंजिरीची पारायणे

By admin | Published: August 11, 2016 1:06 AM

प्रमोद आहेर, शिर्डी साईसमाधी शताब्दीच्या अनुषंगाने विकास कामांना अद्यापही सुरूवात झाली नसली तरी ग्रामस्थांनी मात्र शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यांचा श्रीगणेशा केला आहे़

प्रमोद आहेर, शिर्डीसाईसमाधी शताब्दीच्या अनुषंगाने विकास कामांना अद्यापही सुरूवात झाली नसली तरी ग्रामस्थांनी मात्र शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यांचा श्रीगणेशा केला आहे़संतकवी दासगणु महाराजांनी बाबांच्या हयातीतच लिहिलेल्या साई स्तवन मंजिरीचे दर गुरूवारी सामुदायिकरित्या साप्ताहिक पारायण होत आहे़ या माध्यमातून शताब्दीच्या अखेरपर्यंत स्तवन मंजिरीची १५१ आवर्तने पूर्ण होणार आहेत़गुरूवार, दि़ ७ जानेवारी २०१६ रोजी समाधी मंदिराच्या उत्तरेस असलेल्या सरंजाम बागेच्या जागेत नगराध्यक्षा अनिता विजय जगताप, संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला़ ११ आॅगस्ट रोजी या उपक्रमाला बत्तीस आठवडे पूर्ण होत आहेत़सार्इंची प्रार्थना करण्याची सोपी व प्रभावी साधना म्हणून विविध भाषेत अनुवादीत झालेल्या साईस्तवन मंजिरीला जगभरातील साईभक्तांमध्ये मान्यता आहे़ आपल्या आयुष्यात एकदाच येणारा हा ऐतिहासिक समाधी शताब्दी सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी राजेंद्र सुभाष कोते, प्रमोद गोंदकर, सर्जेराव कोते, कमलाकर कोते, राहुल गोंदकर व अमोल गायके यांच्या संकल्पनेतून साई स्तवन मंजिरीच्या साप्ताहिक सामुदायिक वाचनाची मुहूर्तमेढ रोवली गेली़प्रत्येक गुरूवारी सायंकाळी पावणे सात वाजता शहरातील एखाद्या ठरलेल्या भाविकाच्या घरी स्तवन मंजिरीचे सामुदायिक वाचन सुरू होते़ अर्ध्या तासाच्या वाचनानंतर शिर्डी माझे पंढरपूर व अन्य आरत्यांनी कार्यक्रमाची सांगता होते़ ज्याच्याकडे कार्यक्रम आहे तो भाविक उपस्थितांना यथाशक्ती चहा, फराळ किंवा जेवण देतो, अर्थात हा ऐच्छिक भाग असतो़कार्यक्रमातच पुढील आठवड्याचा यजमान ठरतो़ यानंतर प्रमोद गोंदकर आठवडाभर प्रसिद्धीची जबाबदारी पार पाडतात़ कार्यक्रमाच्या दुपारी आयोजकांच्या वतीने सार्इंची प्रतिमा, साऊंड सिस्टीम व स्तवन मंजिरीची पुस्तके पोहच केली जातात़ सायंकाळी आयोजक तसेच डॉ़ धनंजय जगताप, माधुरी राजेंद्र शिंदे, वैशाली वसंत गोंदकर, रूपाली सचिन तांबे, रूपाली सोमनाथ शेळके आदींसह उपक्रमाचा भाग बनलेले शंभर स्त्री-पुरूष वाचक कार्यक्रमस्थळी जातात़ तेथे परिसरातील दोन-तीनशे भाविक उपस्थित असतात़ संस्थानचे प्रमुख पुजारी बाळासाहेब जोशी व ग्रामजोशी वैभवशास्त्री रत्नपारखी यांच्या पौरोहित्याखाली साईस्तवन मंजिरीचे सामुदायिक पठण होते़ कार्यक्रमानंतर साईप्रतिमा पुढील कार्यक्रमापर्यंत त्याच यजमानाच्या घरी असते़ तो त्या प्रतिमेची रोज पूजाअर्चा करतो़ हा कार्यक्रम आपल्या घरी घेण्यासाठी चढाओढ लागलेली असते़