शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

शिवसेनेच्या मंत्र्यांचे काम चांगले

By admin | Published: April 23, 2016 11:38 PM

अहमदनगर : राज्यातील सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचे काम चांगले आहे. सत्तेत असो की विरोधात, जनतेचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे.

अहमदनगर : राज्यातील सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचे काम चांगले आहे. सत्तेत असो की विरोधात, जनतेचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. सत्तेपेक्षा शिवसेना आता जनतेच्या प्रश्नांसाठी काम करीत आहे,असे युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सांगितले.पूर्णवाद परिवारातर्फे ठाकरे यांना शनिवारी पारनेर येथे युवक क्रांतीवीर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. शाल आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राज्यात शिवसेनेची सत्ता आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ठाकरे म्हणाले, राज्यात युतीची सत्ता असली तरी शिवसेनेच्या मंत्र्यांचे काम चांगले आहे. फक्त शिवसेनेच्याच मंत्र्यांचे काम चांगले आहे का? यावर त्यांंनी मौैन बाळगले. ते म्हणाले. आम्ही फक्त काम करतो. पारनेर येथे फक्त आशीर्वाद घेण्यासाठीच आलो आहे. लोकांचे प्रश्न घेऊन शिवसेना काम करीत आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणे अजिबात गैर नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना लढते आहे,विरोधक म्हणून नव्हे. आंदोलनातून जनतेची भूमिका मांडत आहोत.सत्काराला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, मी कोणतेही काम केलेले नाही, ज्यामुळे हा पुरस्कार दिला गेला आहे. पुरस्काराने काम करण्याची जबाबदारी वाढली आहे. जगातील सर्व क्रांती, संशोधन १५ ते २५ या वयोगटातील तरुणांनीच केल्या आहेत. आई-वडील-आजोबा आणि शिवसैनिक यांच्याशिवाय मी शून्य आहे. अन्न-पाणी-पर्यावरणावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. आगामी काळात पाण्यावरून महायुद्ध होऊ शकते. मराठवाडा-विदर्भात दुष्काळ मोठा आहे. तिथे पाणी कसे पोहचवायचे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अन्न-पाणी कसं वाचविले पाहिजे, याचे धडे अभ्यासक्रमात असायला पाहिजेत. मुंबईजवळील जव्हार गावात पाहणी केली. तिथे मोबाईल पोहोचला आहे. फेसबुक पोहोचले आहे, मात्र पाणी पोहोचलेले नाही. आपण नेमके काय वाचवतोय, तेच कळत नाही. सामाजिक जबाबदारी म्हणून शिवसेनेने जालना, औरंगाबाद येथे अनेक मुला-मुलींची लग्नं लावून दिली. आता बीडमध्ये लग्नसोहळा होत आहे. काम करीत असताना ग्राऊंडलेवलवरून फीडबॅक हवा आहे. नाहीतर परिस्थिती बिघडते. पाण्यासाठी संचारबंदी कधी पाहिली नव्हती. म्हणून भारतीय संस्कृतीनुसार पंचमहाभूतांची पूजा करण्याच्या संस्कृतीचे जतन झाले पाहिजे. (प्रतिनिधी)