शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

वाहनचालक प्रश्नावर लवकरच तोडगा काढू

By admin | Published: August 27, 2014 11:00 PM

रिक्षा चालकांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करू ,अशी ग्वाही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

राहाता : वाहनचालक परवान्याविषयी परिवहन विभागाने शिक्षणाची टाकलेली अट शिथील करण्याबाबत आपण परिवहनमंत्र्यांशी चर्चा केली असून, याबाबत योग्य तो मार्ग काढून रिक्षा चालकांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करू ,अशी ग्वाही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.शिर्डी शहरात ईद मिलनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विखे बोलत होते. शहराचे उपनगराध्यक्ष संजय सदाफळ, माजी उपनगराध्यक्ष कैलास सदाफळ, मौलाना सय्यद, मौलाना इब्राहीम, मौलाना अजगारी, सोपानराव सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, गोपीनाथ गोंदकर, विष्णू थोरात, बाळासाहेब जपे, विनायक निकाळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश निकाळे, तहसीलदार दळवी आदी याप्रसंगी उपस्थित होते.विखे म्हणाले की, सबका मालिक एक अशी शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या पुण्यभूमीत आपण सर्वजण एकत्रितपणे नांदत आहोत. मुस्लिम समाजाच्या प्रश्नासाठी आपण सातत्याने पुढाकार घेतला. शालेय शिक्षणमंत्री पदावर असताना राज्यात उर्दू शाळांना नवीन चेहरा प्राप्त करून देण्यासाठी आपण सातत्याने निर्णय घेतले. स्वतंत्र शिक्षण संचालक नेमून चार हजार उर्दू शाळांना अनुदान प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला़ शिक्षण हीच शक्ती आहे असे मानून वेगवेगळ्या ठिकाणी अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्या. प्रवरा शिक्षण संकुलातून डॉक्टर आणि अभियंता झालेले अल्पसंख्यांक विद्यार्थी आता राज्यात ठिकठिकाणी यशस्वीपणे काम करीत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करतानाच राहाता शहरात कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा आपण निश्चितच विचार करू, असे ते म्हणाले. (वार्ताहर)रिक्षा बंद करण्याच्या निर्णयासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांशी आपण चर्चा केली. मात्र परिवहन विभागानेच वाहन चालक परवान्यासाठी आता शिक्षणाची अट घातलेली आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांची भेट घेतली असून, लवकरच यावर तोडगा काढू़-राधाकृष्ण विखे, कृषिमंत्री