शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

सोलापूर बनले साखरेचे आगार : अहमदनगरची मक्तेदारी मोडली

By मिलिंदकुमार साळवे | Published: October 27, 2018 11:40 AM

मिलिंदकुमार साळवे अहमदनगर : राज्यात व देशात एकेकाळी साखरेची आगार अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख निर्माण झाली होती. पण आता ...

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : राज्यात व देशात एकेकाळी साखरेची आगार अशी अहमदनगर जिल्ह्याची ओळख निर्माण झाली होती. पण आता ही अहमदनगरची साखर धंद्यातील मक्तेदारी मोडीत काढून सोलापूर जिल्हा साखरेचे आगार बनले आहे.आशिया खंडातील व भारतातील पहिला खासगी ब्रॅडी साखर कारखाना अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव (ता. श्रीरामपूर) येथे सुरू झाला होता. त्याच अहमदनगर जिल्ह्यात पुढे भारतातील सहकारी तत्वावरील पहिला प्रवरा सहकारी साखर कारखाना सुरू झाला. नंतर दिवंगत अण्णासाहेब शिंदे केंद्रीय शेती मंत्री असताना अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी व खासगी कारखाने सुरू झाले. पुढे हा जिल्हा साखरेचे आगारच बनले. पण आता साखरेचे आगार अशी अहमदनगरची ओळख पुसली गेली आहे. राज्याचे सहकारमंत्री पद भूषविणाऱ्या सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्याने अहमदनगर जिल्ह्यास मागे सारत सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा अशी नवी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच सोलापूर आता साखरेचे नवे आगार निर्माण झाले आहे.देशमुख यांचे स्वत:चे दोन खासगी कारखाने आहेत. साखर आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात राज्यात १८८ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केले. यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३१ कारखान्यांचा समावेश होता. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील २२, पुणे जिल्ह्यातील १७, सातारा जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा समावेश होता. त्यानंतर मराठवाडा विभागात उस्मानाबादचा पहिला क्रमांक आहे. या जिल्ह्यात मराठवाड्यातील सर्वाधिक १०,‘मांजरा’ गाजविणा-या लातूर जिल्ह्यात ८ कारखाने आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यात अवघे २ कारखाने आहेत.खासगीचा बोलबोलासाखरेचे नवे आगार बनलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३१ कारखान्यांमध्ये निम्मे म्हणजे १६ कारखाने खासगी तत्त्वावरील आहेत. तर २२ कारखान्यांच्या अहमदनगर जिल्ह्यात ८ कारखाने खासगी आहेत. साखर कारखानदारीवर पकड असणा-या पवारांच्या पुणे जिल्ह्यात ६ कारखाने खासगी आहेत.अहमदनगरचे कारखानेगस्ती, ज्ञानेश्वर, अशोक, पद्मश्री विखे, गणेश, कोपरगाव, मुळा, संगमनेर, संजीवनी, श्रीगोंदा, वृद्धेश्वर, कुकडी, केदारेश्वर, तनपुरे हे सहकारी कारखाने, तर पियुष, अंबालिका, गंगामाई, प्रसाद, जय श्रीराम, श्री क्रांती शुगर, साईकृपा १ व २, युटेक हे खासगी कारखाने अहमदनगर जिल्ह्यात आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने