शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

दहा तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा

By admin | Published: July 24, 2016 11:53 PM

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे़ परंतु पावसाला हवा तसा जोर नाही़ जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पावसाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलंडली आहे़

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे़ परंतु पावसाला हवा तसा जोर नाही़ जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पावसाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलंडली आहे़ मात्र दहा तालुक्यांत जेमतेमच ४५ टक्केपेक्षा कमी पाऊस पडला़ त्यामुळे खरिपाची चिंता दूर झाली खरी, पण पुढे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे़ धरण पाणलोट क्षेत्रात मध्यंतरी पावसाचा जोर वाढला़ त्यामुळे भंडारदरा व मुळा धरणातील पाण्याच्या टक्केवारीने पन्नाशी ओलंडली़ धरण निम्मे भरल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली़ पुढील आॅगस्टच्या १५ तारखेपर्यंत मुळा धरण १०० टक्के भरते, असा अनुभव आहे़ जुलैचा शेवटचा आठवडा सुरू झाला़ पण धरणे निम्मेच आहे़ त्यामुळे धरणांतून शेतीसाठी पाणी देता येईल, अशी स्थिती सध्या तरी नाही़ जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे़ तुलनेने पाऊस कमी आहे़ जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार अकोले, श्रीरामपूर, शेवगाव आणि कर्जत तालुक्यांत ५० टक्केहून अधिक पाऊस पडला़ पण, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, नेवासा, राहाता, राहुरी, नगर, पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यांत जेमतेम ४५ टक्के पाऊस पडला़ निम्म्यापेक्षा कमी पाऊस पडलेल्या तालुक्यांची संख्या अधिक आहे़ढगाळ वातावरण आहे़ पावसाच्या सरींवर सरी सुरू आहेत़ त्यामुळे खरिपाची पिके तग धरून आहेत़ त्यात पावसाच्या हलक्या सरींमुळे पिकांवर दुष्परिणाम झाला आहे़ तण कमालीचे वाढले आहे़ खुरपणीसाठी माणसे मिळत नाहीत़ सततच्या पावसाने खुरपणीच्या कामात अडथळा येत असल्याने बळीराजाही हैराण आहे़ कमी पाऊस त्यात वाढलेले तण, यामुळे पिकेही धोक्यात आहेत़ मागील वर्षी दक्षिण नगर जिल्ह्यातील जुलैअखेर निम्म्याहून अधिक पाऊस पडला होता़ तुलनेत यंदा दक्षिणेतील जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी, पारनेर, नगर तालुक्यांत कमी पाऊस पडला़याउलट स्थिती उत्तर नगर जिल्ह्यात आहे़ मागील वर्षी उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले वगळता संगमनेर, कोपरगाव, राहुरी, राहाता, नेवासा तालुक्यांत कमी पाऊस पडला होता़ यंदा जुलैअखेर उत्तर नगर जिल्ह्यात ३० टक्केहून अधिक पाऊस पडला़ त्यामुळे खरिपाची चिंता दूर झाली खरी, पण त्यानंतरच्या पिकांचे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे़ पोषक वातावरण असूनही पावसाची टक्केवारी वाढत नसल्याने मोठ्या पावसाठी परतीच्या मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार काय, अशी भिती व्यक्त होत आहे़